शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर पेपर मिल समस्येवर मुख्यमंत्री गंभीर

By admin | Updated: November 13, 2016 00:37 IST

बल्लारपूर पेपर मिलची आज सर्व बाबतीत वाईट स्थिती झाली आहे.

तूर्त चर्चा : नागपूर हिवाळी अधिवेशनात तोडगा काढण्याचे संकेतबल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिलची आज सर्व बाबतीत वाईट स्थिती झाली आहे. या मिलला, कच्चा माल बांबूचा तुटवडा भासत आहे त्यामुळे उत्पादन ठप्प आहे. या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर असून त्यांनी या विषयाशी संबंधित मंत्री, अधिकारी, मिल व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांची बैठक बोलावून त्यावर चर्चा केली. बांबू पुरवठ्याचा प्रश्न नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी व्यवस्थापन तथा कामगार प्रतिनिधींना मुंबई येथे वर्षा बंगल्यावर दिले.या बैठकीला वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, कामगार आयुक्त यशवंत केरूरे, सहायक कामगार आयुक्त अनिल लासटवार, व्यवस्थापनाकडून पेपर मिलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी निहार अग्रवाल, असोसिएट वाईस प्रेसिडेंट (मानव संसाधन) रणजी अब्राहम, बिल्ट बल्लारपूरचे मुख्य महाव्यवस्थापक व्यंकटेशरलू, जनसंपर्क अधिकारी नरेंद्र रावेल आणि बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेकडून महासचिव वसंत मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग, अ‍ॅड. अविनाश ठावरी आदी उपस्थित होते. आर्थिक संकट आणि कच्चा मालाभावी मिल उत्पादन बंद असल्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन, सुपर बोनस, एलटीए आदींचे सुमारे ३८ कोटी ५० लाख रुपये थकीत आहेत. या समस्या व्यवस्थापन आणि कामगार नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. पेपर मिल व्यवस्थापनाने नेहमीप्रमाणे बांबूकरिता निविदा भरल्या. परंतु त्याचे पुढे काय झाले, याचे लिखित उत्तर वन विभागाने दिलेले नाही. वन विभागाकडून पेपर मिलची अडवणूक केली जात आहे, अशी तक्रार त्या बैठकीत करण्यात आली. हे सारे ऐकून घेऊन, पेपर मिल मजदूर सभेने मे महिन्यात, बांबूच्या मागणीकरिता उपोषण करताना, मुख्यमंत्र्याशी सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी चर्चा केली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी, वन विभागाची पडिक जमीन पेपर मिलला बांबूचे उत्पादन करण्याकरिता दिली जाईल, असे सांगितले. शासनाने ‘पेसा’ कडून बांबू विकत घ्या, असे बजावले आहे. मात्र, त्यात बऱ्याच अडचणी येत आहे. म्हणून, आजवर वन विभागाकडून ज्या पद्धतीने मिलला बांबू देण्यात येत होता, त्याच पद्धतीने बांबू देण्याची सोय व्हावी, अशी विनंती करण्यात आली. सध्या नगर पालिकांच्या निवडणुका आहेत. आचार संहितेमुळे ठोस आश्वासन देता येत नाही. निवडणुका संपून आचारसंहितेनंतर त्यावर नेमका मार्ग काढू, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले. ही माहिती पत्रपरिषदेत वसंत मांढरे यांनी दिली. तसेच पेपर मिल विकत घेण्यासाठी जे.के.सोबत सुरू असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. आता थापर समूहच मिल चालविणार व २०१७ ला स्थिती पूर्ववत येणार, असे मांढरे यांनी ठासून सांगितले. या पत्रपरिषदेत तारासिंग, रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)