शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

शेतकऱ्यांकडील थकीत कृषी कर्जाची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 6:00 AM

कर्जाच्या तपासणीमुळे शेतकºयांचे खाते अपडेट होणार असून नवीन कृषी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज काढावे लागते. याकरिता राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना राज्य शासनाकडून उद्दिष्ट दिल्या जाते.

ठळक मुद्देलेखापरीक्षकांच्या नियुक्त्या : १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतची माहिती घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसी) व विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्ज व मध्यम मुदत कर्जाचे वितरण करण्यात आले होते. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील पीककर्ज, मध्यम मुदतकर्ज व पुनर्गठण झालेल्या थकीत कर्जाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात लेखा परिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कर्जाच्या तपासणीमुळे शेतकºयांचे खाते अपडेट होणार असून नवीन कृषी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज काढावे लागते. याकरिता राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना राज्य शासनाकडून उद्दिष्ट दिल्या जाते. मागील चार वर्षांच्या कालखंडात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळल्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी कधीही उद्दिष्टपुर्ती केली नाही. त्या तुलनेत ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या विविध कार्यकारी संस्थांनी पीक कर्ज वाटपाकडे लक्ष दिल्याचे दिसून येते. परंतु, कर्जधारक शेतकऱ्यांचे खाते अपडेट करण्यात दिरंगाई झाली.परिणामी, नवीन कर्ज मिळण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे थकीत कर्जाची तपासणी करून अहवाल सादर करण्याची मागणी शेतकºयांनी केली. सहकार विभागालाही याचे महत्त्व पटल्याने तसा आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार सहनिबंधक, लेखापरिक्षक, जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग- १ यांना १७ डिसेंबर २०१९ रोजी सूचना देण्यात आल्या. हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.शेतकऱ्यांच्या अपेक्षाजिल्ह्यात विविध कार्यकारी सहकारी संस्थांची संख्या एक हजार पेक्षा अधिक आहे. या संस्थांचे दरवर्षी लेखापरिक्षण होते. मात्र, सहकार आयुक्तांच्या आदेशान्वये पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज व पुनर्गठण झालेल्या थकीत कर्जाचा या तपासणीत समावेश आहे. जिल्हा विशेष लेखापरिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली. अहवाल वेळेत देण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी तपासणी करणार आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यानंतर तरी पीक कर्ज व अन्य योजनांचा लाभ मिळणार का, याकडे शेतकºयांच्या लक्ष लागले आहे.सहकार आयुक्तांकडे होणार अहवाल सादरशेतकऱ्यांना १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील वितरित केलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत कर्जाची तपासणी करण्याचे काम जिल्ह्यात सुरू करण्यात आले. सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी या कालावधीत शेतकऱ्यांना वितरीत पीककर्ज, मध्यम मुदतकर्ज व पुनर्गठण कर्जाची तपासणी केल्यानंतर सदर अहवाल सहकार आयुक्तालयाकडे सादर केले जाणार आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज