शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

एक ‘तपा’पासून शेतकरी जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: November 15, 2015 00:36 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाकडून तलावाची निर्मिती करण्यात येते.

ठिय्या आंदोलन : मोबदल्याच्या प्रतीक्षेतच तीन शेतकऱ्यांचा मृत्यूखडसंगी: शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाकडून तलावाची निर्मिती करण्यात येते. चिमूर तालुक्यातील लघु सिंचाई विभागांतर्गत सन २००२ मध्ये डोंगर्ला येथील शेतकऱ्याची जमीन तलावासाठी व नहरासाठी जमीन शासनाने संपादित केली. मात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही दिला नसल्याने डोंगर्ला येथील शेतकऱ्यांना एका ‘तपा’पासून मोबदल्याची प्रतीक्षा आहे.चिमूर तालुक्यात आजही ५२ हजार ७०० हेक्टर शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी निसर्गावर अवलंबून असतात. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकरी उत्पन्नापासून वंचित आहेत. परिणामी त्यांना आर्थिक विवंचनेत जीवन जगावे लागत आहे. या शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता शासन काही प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था करीत आहे.चिमूर तालुक्यातील कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी, यासाठी लघु सिंचाई विभागामार्फत तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावासाठी डोंगर्ला येथील अकरा शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करण्यात आली. त्यामध्ये केशव सिजु चौधरी व इतर यांची १.२२ हेक्टर आर, रामकृष्ण चौधरी (मय्यत) यांची ०.४९ हे.आर, माणिक लक्ष्मण चौधरी यांची १.६५ हे.आर, दिवाकर शिवराम जांभुळे १.२२ हे.आर., बाळकृष्ण शिवराम जांभुळे व इतर यांची ०.३५ हे.आर., योगराज जांभुळे व इतर यांची ०.१५ हे.आर., धनराज बाजीराव चौधरी यांची २.६५ हे.आर., मेघराज गोपाळा चौधरी ०.८५ हे.आर., बाजीराव नामा चौधरी (मय्यत) व इतर यांची ०.२५ हे.आर. व नथ्थु कवडू चौधरी यांची ०.४९ हे.आर. जमिनी संपादित केली. मात्र १२ वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने या आदिवासी शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. त्यामुळे हे शेतकरी अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजावीत आहेत. मात्र शासनाच्या दप्तर दिरंगाईने या शेतकऱ्यांना आज नाही उद्या मोबदला देतो, अशा आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.काही शेतकरी कार्यालयाच्या चकरा मारता मारता मृत झालेत. मात्र अजुनही त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, याकरिता स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयात ९ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)