शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

एक ‘तपा’पासून शेतकरी जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: November 15, 2015 00:36 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाकडून तलावाची निर्मिती करण्यात येते.

ठिय्या आंदोलन : मोबदल्याच्या प्रतीक्षेतच तीन शेतकऱ्यांचा मृत्यूखडसंगी: शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाकडून तलावाची निर्मिती करण्यात येते. चिमूर तालुक्यातील लघु सिंचाई विभागांतर्गत सन २००२ मध्ये डोंगर्ला येथील शेतकऱ्याची जमीन तलावासाठी व नहरासाठी जमीन शासनाने संपादित केली. मात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही दिला नसल्याने डोंगर्ला येथील शेतकऱ्यांना एका ‘तपा’पासून मोबदल्याची प्रतीक्षा आहे.चिमूर तालुक्यात आजही ५२ हजार ७०० हेक्टर शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी निसर्गावर अवलंबून असतात. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकरी उत्पन्नापासून वंचित आहेत. परिणामी त्यांना आर्थिक विवंचनेत जीवन जगावे लागत आहे. या शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता शासन काही प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था करीत आहे.चिमूर तालुक्यातील कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी, यासाठी लघु सिंचाई विभागामार्फत तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावासाठी डोंगर्ला येथील अकरा शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करण्यात आली. त्यामध्ये केशव सिजु चौधरी व इतर यांची १.२२ हेक्टर आर, रामकृष्ण चौधरी (मय्यत) यांची ०.४९ हे.आर, माणिक लक्ष्मण चौधरी यांची १.६५ हे.आर, दिवाकर शिवराम जांभुळे १.२२ हे.आर., बाळकृष्ण शिवराम जांभुळे व इतर यांची ०.३५ हे.आर., योगराज जांभुळे व इतर यांची ०.१५ हे.आर., धनराज बाजीराव चौधरी यांची २.६५ हे.आर., मेघराज गोपाळा चौधरी ०.८५ हे.आर., बाजीराव नामा चौधरी (मय्यत) व इतर यांची ०.२५ हे.आर. व नथ्थु कवडू चौधरी यांची ०.४९ हे.आर. जमिनी संपादित केली. मात्र १२ वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने या आदिवासी शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. त्यामुळे हे शेतकरी अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजावीत आहेत. मात्र शासनाच्या दप्तर दिरंगाईने या शेतकऱ्यांना आज नाही उद्या मोबदला देतो, अशा आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.काही शेतकरी कार्यालयाच्या चकरा मारता मारता मृत झालेत. मात्र अजुनही त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, याकरिता स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयात ९ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)