शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

स्वस्त धान्य दुकानाविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:52 IST

स्वस्त धान्य दुकानातून बीपीएल, एपीएलधारकांना दर महिन्यात ३५ किलो धान्य देण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाला डावलून किटाळीत स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना केवळ २५ किलोच धान्य दिले जात आहे.

ठळक मुद्देकिटाळीच्या नागरिकांची धडक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानातून बीपीएल, एपीएलधारकांना दर महिन्यात ३५ किलो धान्य देण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाला डावलून किटाळीत स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना केवळ २५ किलोच धान्य दिले जात आहे. मात्र राशन कॉर्डवर ३५ किलो धान्याची नोंद करण्यात येत आहे. त्यामुळे स्वास्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची लूट होत असल्यामुळे किटाळीतील लाभार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.चंद्रपूर तालुक्यातील किटाळी गावची लोकसंख्या हजार ते बाराशेच्या जवळपास आहे. या गावातील २५ टक्के नागरिक शेती तर ७५ टक्के लोक मजुरी करून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतात. गावातील बीपीएल, एपीएल आणि प्राधान्यक्रमाने कुटुंबीयांना गहू, तांदूळ आणि साखर देण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार नमू शेंडे यांच्याकडे आहे. गावात अंत्योदयचे ९०, एपीएलचे ४० आणि प्राधान्यप्रमाणे कुटुंबीयांना लाभ, यांचे शेकडो लाभार्थी आहेत. अंत्योदय लाभार्थ्यांना ३५ किलो तर प्राधान्यक्रमाने कुटुंबीयांना लाभानुसार प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य देण्याचा नियम आहे. मात्र किटाळीतील स्वस्त धान्य दुकानदार कधीच पूर्णपणे धान्य देत नाही. केवळ २५ किलो धान्य देतो. मात्र रेशन कॉर्डवर ३५ किलो धान्य दिल्याची नोंद करतो. गहू दोन रुपये तर तांदूळ तीन रुपये किलोने लाभार्थ्यांना देण्याचा नियम आहे. मात्र अवाजवी दराने धान्य स्वस्त दुकानदार लाभार्थ्यांना देत आहे. अनेकांना तर तो धान्य देत नाही. धान्य संपले असे सांगून त्यांना घरी पाठवितो. याबाबत पुरवठा विभागाकडे दोनदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे किटाळी येथील लाभार्थ्यांनी सोमवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तसेच आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी सरपंच बाबूराव ठाकरे, माजी सरपंच सदाशिव तुराणकर, शीला आत्राम, ममता रायपूरे, आवडता रामटेके, अनिता दुधकोर, कल्पना अलोणे, मीना ठाकरे, कांता अलोणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन गावकºयांना दिले.