शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
4
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
5
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
6
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
7
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
8
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
9
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
10
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
11
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
12
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
13
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
14
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
15
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
16
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
17
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
18
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
19
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
20
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार

स्वस्त धान्याचा अनियमित पुरवठा

By admin | Published: June 02, 2014 1:05 AM

चिमूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार अनियमित पुरवठा करीत असल्याची ग्राहकांची बोंब आहे...

नेरी : चिमूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार अनियमित पुरवठा करीत असल्याची ग्राहकांची बोंब आहे. संबंधित विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकात शासनाच्या कार्यप्रणालीबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

स्वस्त धान्य पुरवठा दर महिन्याला वाटप व्हायला पाहिजे पण तसे होत नाही. त्यामुळे बरेच कुटुंबांना खासगी दुकानातून धान्य आणून वेळ निभवून घ्यावी लागतो. केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ तीन रु. प्रतिकिलो प्रमाणे धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला, हे धान्य अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रति व्यक्तीला पाच किलो धान्य देण्याची अंमलबजावणी केली. यात अंत्योदय, बीपीएल कार्डधारकाचा समावेश केला आहे. यापूर्वी एका राशन कार्ड वर ३५ किलो धान्य मिळत होते.

मात्र अन्न सुरक्षा योजना आल्यापासून अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो तर बीपीएल कार्ड धारकांना प्रत्येक पाच किलो धान्य देण्यात येते. यामुळे बर्‍याच कुटुंबांना या योजनेचा फटका बसला आहे. दोन तीन जणाचे कुटुंब असल्यास त्या कुटुंबाला फक्त १0 ते १५ किलो धान्य मिळत आहे. १0 ते १५ किलो धान्य महिनाभर पुरणार नाही. अशी गावात जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे योजनेत सुधारणा करून पूर्वीप्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. एपीएल कार्डधारकांची तांदुळ, गहु, साखर पूर्णत: बंद झाल्याने कार्डधारकांचा त्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आहे.

ही योजना चालू झाल्यापासून अंत्योदय, बीपीएल व एपीएल कार्ड धारकाला सरकारी स्वस्त दुकानातून साखर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. यांचा नागरिकांना फटका बसत आहे. किराणा दुकानातून ३८ रु. किलोप्रमाणे साखर खरेदी करून आपल्या चहाची तलप भागवीत असताना दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे ३८ रुपये किलोची साखर घेणे अवघड होत आहे. त्यामुळे सरकारी स्वस्त धान्य दुकानात दर महिन्याला साखरीत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

सरकारी स्वस्त धान्य दुकानात तांदुळ, गहु, साखर, तेल, दाल आदी गरजू वस्तु सरकारी स्वस्त दुकानात शासनाने देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या परिसरातील सरकारी स्वस्त धान्य दुकानात हे साहित्य दिले आहेत. पण लायसन्सधारक वाटप न करता संबंधित व्यक्तीला वाटप करावयाला लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)