शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मद्यपी वाहनचालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST

चंद्रपूर : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या १३ वाहनचालकांवर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बंगाली कॅम्प, दुर्गापूर सुमित्रानगर, बाबूपेठ व पडोली, ...

चंद्रपूर : मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या १३ वाहनचालकांवर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बंगाली कॅम्प, दुर्गापूर सुमित्रानगर, बाबूपेठ व पडोली, घुग्घुस व वरोरा येथे केली. आरोपींविरूद्ध वाहनचालकांवर १८४ व १८५ मोकावा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई

चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेऊन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाºया १५ वाहनचालकांवर वेगवेळ्या ठिकाणी पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. आरोपी हे बाबूपेठ, बंगाली कॅम्प, दुर्गापूर, रयतवारी कॉलरी व गांधी चौक परिरातील निवासी आहेत. पोलिसांनी १४ वाहनचालकांवर कलम भांदवि २८३ अन्वये गुन्हा दाखल केला.

तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

चंद्रपूर : येथील तहसील कार्यालयात १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर अनिष्ट परिणाम झाला. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येतात. परंतु, कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात राज्यशासनाकडे पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

गतिरोधकाअभावी अपघातांमध्ये वाढ

चंद्रपूर : दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातून चंद्रपूर-ताडोबा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बांधण्याची मागणी दुर्गापूर येथील नागरिकांनी केली आहे.

मोकळ्या जागेवर कचरा टाकल्यास कारवाई करा

चंद्रपूर :विठ्ठल मंदिर वार्डात काही ठिकाणी मोकळ्या जागेवर कचरा टाकल्या जात आहे. कचरा कुंड्या असतानाही हा प्रकार घडत आहे. मोकाट जनावरांमुळे कचरा नाल्यांमध्ये जाऊन तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. त्यामुळे मनपाने स्वच्छता कर्मचाºयांना तातडीने वार्डात पाठवावे व रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

नवरगाव-सिंदेवाही रस्त्यावर खड्डे

सिंदेवाही : नवरगाव ते सिंदेवाही रस्ता अरुंद आहे. त्यातही रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेड संघनेच्या वतीने करण्यात आली आहे.

अंधारी, उमा नदीला घाणीचा विळखा

मूल : अंधारी, उमा, शिरना, इरई, झरपट आदी नद्या बारमाही वाहतात. परंतु या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. काही पर्यंटक नदीचे पाणी बघण्यासाठी येत असतात. पण नदीत घाण पसरल्यामुळे पर्यंटकांना दुर्गधीचा सामना करावा लागत आहे.