शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकर होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:30 IST

चंद्रपूर शहर सध्या होरपळून निघत आहे. मागील पाच दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जणू संपूर्ण चंद्रपूर शहरालाच आग लावण्याचा विडा सूर्याने उचलला की काय, असा भास होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले.

ठळक मुद्देसूर्याचा कोप कायम : जनजीवन प्रभावित, दुपारी रस्ते निर्मनुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर सध्या होरपळून निघत आहे. मागील पाच दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जणू संपूर्ण चंद्रपूर शहरालाच आग लावण्याचा विडा सूर्याने उचलला की काय, असा भास होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले. दुपारी चंद्रपुरातील रस्ते ओस पडत आहे. डोक्यावर टोपी, कानाला रुमाल बांधल्यानंतरही उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना धडकी भरत आहे. रविवारी ४७.२ अंश सेल्सिअस हे राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपुरात नोंदविण्यात आले. सोमवारीही ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.चंद्रपूरकरांना पूर्वी कधी एवढे उन्हाने घाबरविले नाही. मात्र यावेळी एप्रिल महिन्यातच तापमानाने कहर केला आहे. एप्रिल महिन्यातच चंद्रपूरकरांनी मे महिन्यातला नवतपा अनुभवला आहे. कडक उन्हाळ्यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्ते असे निर्मनुष्य झाले आहे. उष्माघाताच्या बचावासाठी बहुतांश नागरिकांच्या खिशात कांदा दिसून येतो.उष्ण वारे वाहत आहेत. यावर्षीच्या उन्हाळा जीवघेणा ठरत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट आहे. एरवी गल्लीबोळात दुपारी फिरणारे फेरीवाले आता फिरताना दिसत नाहीत.नागरिकांचीही वर्दळ नसते. दिवसभर कुलरच्या हवेत कामकाज सुरू आहे. बसेसमध्ये गर्दी कमी दिसू लागलेली आहे.सूर्य प्रखरतेने तापत आहे. सर्वत्र वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम जाणवत आहे. अत्यावश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडले तरीही पाच मिनिटातच ते थंड ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.कुलर, पंख्यानेही दिलासा नाहीकालप्रवाहात तापमानापासून संरक्षित ठेवण्यासाठी कुलर, पंखे, एसी आदी इलेक्ट्रीक साधने उपलब्ध झालीत. दिवसागणिक वाढत जाणारे तापमान असह्य होत आहे. जिल्ह्यातील आबाल - वृद्ध रखरखत्या उन्हात जिथे गारवा मिळते तिकड धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तापमानाने एवढा उच्चांक गाठला आहे की घरातील कुलर, पंखेही नागरिकांना दिलासा देण्यास असमर्थ ठरत आहे.रस्ते झाले निर्मनुष्यएप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली. पारा ४७ अंशापार गेला आहे. दुपारच्या सुमारास गावातील रस्ते तर निर्मनुष्य दिसत आहेतच, सोबत शहराबाहेरील रस्तेही ओस दिसत आहे. चंद्रपूर-मूल, चंद्रपूर-बल्लारपूर, चंद्रपूर-घुग्घूस या मार्गावरही दुचाकींची वर्दळ दिसत नाही.ग्रामीण भागातदेखील शेतीची कामांवर परिणाम होत आहे. पूर्वी शेतकरी उन्हाळ्यात दिवसभर शेतात राबताना दिसायचे. मात्र आता उन्हामुळे त्यांनाही घाबरवून टाकले आहे. दुपारी १२ वाजताच शेतकरी शेतातून घरी येऊ लागले आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पुन्हा शेतात कामासाठी जाताना दिसत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सर्वाधिक महत्त्वाच्या आठवडी बाजारातही याचा परिणाम दिसत आहे. कोठारी येथे रविवारी आठवडी बाजारात शुकशुकाट होता.