शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

चंद्रपूरकर होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:30 IST

चंद्रपूर शहर सध्या होरपळून निघत आहे. मागील पाच दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जणू संपूर्ण चंद्रपूर शहरालाच आग लावण्याचा विडा सूर्याने उचलला की काय, असा भास होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले.

ठळक मुद्देसूर्याचा कोप कायम : जनजीवन प्रभावित, दुपारी रस्ते निर्मनुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर सध्या होरपळून निघत आहे. मागील पाच दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जणू संपूर्ण चंद्रपूर शहरालाच आग लावण्याचा विडा सूर्याने उचलला की काय, असा भास होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले. दुपारी चंद्रपुरातील रस्ते ओस पडत आहे. डोक्यावर टोपी, कानाला रुमाल बांधल्यानंतरही उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना धडकी भरत आहे. रविवारी ४७.२ अंश सेल्सिअस हे राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपुरात नोंदविण्यात आले. सोमवारीही ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.चंद्रपूरकरांना पूर्वी कधी एवढे उन्हाने घाबरविले नाही. मात्र यावेळी एप्रिल महिन्यातच तापमानाने कहर केला आहे. एप्रिल महिन्यातच चंद्रपूरकरांनी मे महिन्यातला नवतपा अनुभवला आहे. कडक उन्हाळ्यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्ते असे निर्मनुष्य झाले आहे. उष्माघाताच्या बचावासाठी बहुतांश नागरिकांच्या खिशात कांदा दिसून येतो.उष्ण वारे वाहत आहेत. यावर्षीच्या उन्हाळा जीवघेणा ठरत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट आहे. एरवी गल्लीबोळात दुपारी फिरणारे फेरीवाले आता फिरताना दिसत नाहीत.नागरिकांचीही वर्दळ नसते. दिवसभर कुलरच्या हवेत कामकाज सुरू आहे. बसेसमध्ये गर्दी कमी दिसू लागलेली आहे.सूर्य प्रखरतेने तापत आहे. सर्वत्र वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम जाणवत आहे. अत्यावश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडले तरीही पाच मिनिटातच ते थंड ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.कुलर, पंख्यानेही दिलासा नाहीकालप्रवाहात तापमानापासून संरक्षित ठेवण्यासाठी कुलर, पंखे, एसी आदी इलेक्ट्रीक साधने उपलब्ध झालीत. दिवसागणिक वाढत जाणारे तापमान असह्य होत आहे. जिल्ह्यातील आबाल - वृद्ध रखरखत्या उन्हात जिथे गारवा मिळते तिकड धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तापमानाने एवढा उच्चांक गाठला आहे की घरातील कुलर, पंखेही नागरिकांना दिलासा देण्यास असमर्थ ठरत आहे.रस्ते झाले निर्मनुष्यएप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली. पारा ४७ अंशापार गेला आहे. दुपारच्या सुमारास गावातील रस्ते तर निर्मनुष्य दिसत आहेतच, सोबत शहराबाहेरील रस्तेही ओस दिसत आहे. चंद्रपूर-मूल, चंद्रपूर-बल्लारपूर, चंद्रपूर-घुग्घूस या मार्गावरही दुचाकींची वर्दळ दिसत नाही.ग्रामीण भागातदेखील शेतीची कामांवर परिणाम होत आहे. पूर्वी शेतकरी उन्हाळ्यात दिवसभर शेतात राबताना दिसायचे. मात्र आता उन्हामुळे त्यांनाही घाबरवून टाकले आहे. दुपारी १२ वाजताच शेतकरी शेतातून घरी येऊ लागले आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पुन्हा शेतात कामासाठी जाताना दिसत आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सर्वाधिक महत्त्वाच्या आठवडी बाजारातही याचा परिणाम दिसत आहे. कोठारी येथे रविवारी आठवडी बाजारात शुकशुकाट होता.