शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

चंद्रपुरातील पाणी पुरवठा पुन्हा अनियमित

By admin | Updated: February 23, 2016 00:40 IST

मागील काही महिन्यांपासून चंद्रपुरातील पाणी पुरवठा नागरिकांचा संताप अनावर करणारा ठरत आहे.

पाण्याअभावी हाल : अनेक वॉर्डात नळाला पाणीच नाहीचंद्रपूर : मागील काही महिन्यांपासून चंद्रपुरातील पाणी पुरवठा नागरिकांचा संताप अनावर करणारा ठरत आहे. याबाबत नागरिकांनी ओरड केल्यानंतर मनपानेही कोलमडलेल्या पाणी पुरवठ्याबाबत ‘अ‍ॅक्शन’ घेत संबंधित कंपनीला तंबी दिली. त्यानंतर काही दिवस पाणी पुरवठा ठिक सुरू होता. आता पुन्हा यात अनियमितता येत असल्याने नागरिकांची ओरड सुरू झाली आहे. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्यात बराच अनियमितपणा येऊ लागला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. पाईप लाईन जुनी व खिळखिळी असल्याने अनेक ठिकाणी पाईप लाईन लिकेज होऊन काही भागाचा पाणी पुरवठा प्रभावित होतो. असा प्रकार अनेकवेळा घडत असल्याने संबंधित कंपनीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील एक-दोन वॉर्ड सोडले तर जवळजवळ सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत होता. हॉस्पीटल वार्ड, सिव्हील लाईन, रामनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, भानापेठ वार्ड, बालाजी वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, जीवन ज्योती कॉलनी, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात अतिशय कमी पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांनी चांगलीच ओरड केली होती. त्यानंतर याबाबत महानगरपालिकेच्या आमसभेत चांगलाच गदारोळ करण्यात आला. बहुतांश नगरसेवक पाणी पुरवठ्याबाबत आग्रही असल्याने आयुक्त सुधीर शंभरकर यांनी सदर कंपनीला एक पत्र पाठवून तंबी दिली. त्यानंतरही सुधारणा झाली नाही. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारत पाणी पट्टी कर आपल्या हातात घेणे सुरू केले आहे. या कारवाईनंतर पाणी पुरवठा काही दिवस सुरळीत सुरू राहिला.आता मात्र पुन्हा काही वॉर्डात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. कधीच अनेक भागात नळच येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी नळ येतो पण अतिशय लहान धार असते. त्यामुळे पाणीच मिळत नाही. काही वॉर्डात पुन्हा नळ येण्याची नियोजित वेळ बदलविण्यात आल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)