शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

पाण्याविना चंद्रपूरवासीयांची पाच दिवसांपासून तडफड; मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 18:35 IST

मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त वाॅर्डात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार

मनपाचा नाकर्तेपणा :

चंद्रपूर : इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या किटाळी मार्गावरील मुख्य पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्यास मनपाने निष्क्रियता दाखविल्याने, पाच दिवसांपासून नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी तडफड सुरू आहे.

मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे. अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे चंद्रपुरातील अनेक प्रभागांत जुन्याच योजनेवर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. त्यातच आता पाच दिवसांपासून पाणी पुरवठाच ठप्प आहे.

शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. किटाळी मार्गे ही पाईपलाईन टाकण्यात आली. तेथून ही पाईपलाईन जलशुद्धीकरण केंद्रात आणि त्यानंतर चंद्रपुरातील विविध टाक्यांपर्यंत पोहोचविली जाते. किटाळीजवळील मुख्य पाईपलाईनमधून गळती सुरू असल्याने दुरुस्ती करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पाच दिवस पूर्ण होऊनही दुरुस्ती न केल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची तडफड सुरू आहे.

कॅन घेऊन नागरिकांची धावाधाव

पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांना घागरी घेऊन भटकंती करावी लागत आहे. नागरिक सायकलीवरून कॅन घेऊन जिथे पाणी मिळेल तिथे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. पाच दिवसांपासून घागरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.

पाणी विकत घेणे सुरू झाले

बंगाली कॅम्प, बाबूपेठ व नेहरू नगरात सर्वसामान्य नागरिकांची संख्या अधिक आहे. बहुतांश कुटुंबे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. पाच दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने या भागात हाल सुरू आहेत. बोअरवेल असलेल्या शेजाऱ्यांकडून पाणी घ्यावे लागत आहे, अशी माहिती श्रीधर गेडाम यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीchandrapur-acचंद्रपूर