शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याविना चंद्रपूरवासीयांची पाच दिवसांपासून तडफड; मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 18:35 IST

मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त वाॅर्डात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार

मनपाचा नाकर्तेपणा :

चंद्रपूर : इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या किटाळी मार्गावरील मुख्य पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्यास मनपाने निष्क्रियता दाखविल्याने, पाच दिवसांपासून नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी तडफड सुरू आहे.

मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे. अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे चंद्रपुरातील अनेक प्रभागांत जुन्याच योजनेवर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. त्यातच आता पाच दिवसांपासून पाणी पुरवठाच ठप्प आहे.

शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. किटाळी मार्गे ही पाईपलाईन टाकण्यात आली. तेथून ही पाईपलाईन जलशुद्धीकरण केंद्रात आणि त्यानंतर चंद्रपुरातील विविध टाक्यांपर्यंत पोहोचविली जाते. किटाळीजवळील मुख्य पाईपलाईनमधून गळती सुरू असल्याने दुरुस्ती करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पाच दिवस पूर्ण होऊनही दुरुस्ती न केल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची तडफड सुरू आहे.

कॅन घेऊन नागरिकांची धावाधाव

पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांना घागरी घेऊन भटकंती करावी लागत आहे. नागरिक सायकलीवरून कॅन घेऊन जिथे पाणी मिळेल तिथे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. पाच दिवसांपासून घागरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.

पाणी विकत घेणे सुरू झाले

बंगाली कॅम्प, बाबूपेठ व नेहरू नगरात सर्वसामान्य नागरिकांची संख्या अधिक आहे. बहुतांश कुटुंबे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. पाच दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने या भागात हाल सुरू आहेत. बोअरवेल असलेल्या शेजाऱ्यांकडून पाणी घ्यावे लागत आहे, अशी माहिती श्रीधर गेडाम यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीchandrapur-acचंद्रपूर