शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

प्रयत्न कमी पडल्यानेच चंद्रपूर प्रदूषित

By admin | Updated: June 5, 2014 23:53 IST

चंद्रपूरचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा तयार केला. मात्र विकासाची गती

पत्रकार परिषद: दिलीप बोरलकर यांची माहितीचंद्रपूर : चंद्रपूरचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा तयार केला. मात्र विकासाची गती आणि प्रदूषण नियंत्रणासाठी लागणारे इम्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील वाढत जाणारी तफावत दूर करता आली नाही. शिवाय कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्नही तोकडे पडले. यामुळे चंद्रपूर प्रदूषणमुक्त होऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सचिव डॉ. दिलीप बोरलकर यांनी केले. डॉ. बोरलकर हे एका कार्यक्रमासाठी आज गुरुवारी चंद्रपूरला आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. बोरलकर पुढे म्हणाले, एखादी समस्या निर्माण झाली की एकत्र येऊन त्याचा अभ्यास केला जातो. त्याचे सर्वेक्षण केले जाते. एक फाईल तयार होते. मात्र हा अहवाल मंत्रालयात पडून राहतो. प्रदूषणाची समस्या मोठी आहे. याचे दुष्परिणाम दुरगामी आहेत. त्यामुळे केंद्र, राज्य शासनाच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी अतिशय जलद गतीने प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. हैदराबादला चार हजार टन घनकचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाट होते. मग चंद्रपुरात १३0 टन घनकचर्‍याची विल्हेवाट का होऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनीच उपस्थित केला. प्लॅस्टिकचे प्रदूषण वाढत आहे. ही बाब धोकादायक आहे. प्लॅस्टिक निर्मुलनाची आज निकडीची गरज आहे. ५0 मायक्रॉनपेक्षा कमी प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे. मात्र दुर्दैवाने ही बंदी पाळली जात नाही. या पिशव्या गोळा करणार्‍यांना विशेष आर्थिक फायदा होत नाही. त्यामुळे कुणीही त्या गोळा करीत नाही. पत्रकार परिषदेला आयएमएचे राज उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस, ग्रीन प्लॅनेटचे सुरेश चोपणे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)