शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

Chandrapur: वेकोलि अधिकारी तसेच प्रशासनाला पिपरे (देश.)च्या महिलांचा निर्वाणीचा इशारा

By साईनाथ कुचनकार | Updated: June 18, 2023 16:16 IST

Chandrapur: मागील वर्षी भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) येथे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

- साईनाथ कुचनकार 

चंद्रपूर : मागील वर्षी भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) येथे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पुरामध्ये गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीनंतर लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी गावाला भेट देत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वर्ष लोटत असतानाही काहीच उपाययोजना झाल्या नाही. त्यामुळे आता गावातील नागरिकांसह महिलाही एकवटल्या असून त्यांनी गावात बैठक घेत शासन तसेच प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला असून आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

मागील वर्षी पिपरी (देश) येथे पुरामध्ये मोठे नुकसान झाले. पूरपरिस्थिती बघण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, दिवंगत खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, तत्कालीन जिल्हाधिकारी गुल्हाने, जिल्हा कृषी अधीक्षक बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार सोनवणे आणि बऱ्याच अधिकाऱ्यांनी गावाला भेट देत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काहीच उपाययोजना झाल्या नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना निवेदनही दिले. ग्रामस्थांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर मार्च महिन्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने डॉ. विजय इंगोले, एसडीओ शिंदे, तहसीलदार सोनवणे यांच्या उपस्थितीत ड्रोनमार्फत चित्रीकरण करण्यात आले.

दरम्यान, २९ एप्रिलला वेकोलि क्षेत्रीय महाप्रबंधक आभास चंद्र सिह आणि वेकोलि अधिकाऱ्यांनी पिपरी गावाला भेट दिली. त्यांनीही आश्वासन दिले. मात्र, आता पावसाळा अगदी तोंडावर असतानाही काहीच झाले नसल्याने गावातील नागरिकांची पावसाळ्यापूर्वीच झोप उडाली आहे. त्यामुळे आता नागरिकांसह गावातील महिलांनी एकत्र येत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

शेतात साचली होती राखमागील वर्षी या गावातील शेतजमीन पुराच्या पाण्याखाली होती. पूर ओसरल्यानंतर मात्र जमिनीमध्ये सर्वत्र राखेचा थर साचला होता. त्यामुळे जमीन नापीक झाली. शेतकऱ्यांनी कशीबशी करून जमीन पेरणीसाठी सज्ज केली आहे. मात्र, पुन्हा पावसाळ्याच तीच स्थिती झाल्यास काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :RainपाऊसWomenमहिला