शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

स्वच्छ सर्वेक्षणात चंद्रपूरला ‘थ्री स्टार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

सर्वेक्षणात देशभरातील ३७२ मनपांनी सहभाग घेतला होता. स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीने चंद्रपुरातील विविध स्थळ आणि परिसराची पाहणी केली. हा दौरा प्रशासनाला कोणतीही माहिती न देता केला.  विशेष म्हणजे नागरिकांशी चर्चा करून आणि मनपा प्रशासनाने राबविलेल्या स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे तपशील जाणून घेतले होते.  गोंडपिपरी नगर पंचायतने घनकचारा व्यवस्थापनात उत्तम काम केल्याने पूरस्काराचा मानकरी ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२१ मध्ये उत्तम कामगिरी बजावत चंद्रपूर महानगरपालिकेने थ्री स्टार मानांकन पटकाविले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शनिवारी दिल्ली येथील विज्ञान भवनात महापौर राखी संजय कंचर्लावार, तसेच आयुक्त राजेश मोहिते यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. १ ते १० लाख लोकसंख्येच्या १०० युलबी आधारीत महानगरपालिका गटात देशातील २० शहरातून चंद्रपूर शहर ११ व्या क्रमांकावर आले आहे.सर्वेक्षणात देशभरातील ३७२ मनपांनी सहभाग घेतला होता. स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीने चंद्रपुरातील विविध स्थळ आणि परिसराची पाहणी केली. हा दौरा प्रशासनाला कोणतीही माहिती न देता केला.  विशेष म्हणजे नागरिकांशी चर्चा करून आणि मनपा प्रशासनाने राबविलेल्या स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे तपशील जाणून घेतले होते.  गोंडपिपरी नगर पंचायतने घनकचारा व्यवस्थापनात उत्तम काम केल्याने पूरस्काराचा मानकरी ठरला. ब्रह्मपुरी नगर परिषदेने जीएफसी मानांकन यादीत यंदा स्थान पटकावले आहे.

सिटीझन फिडबॅक गटात मूल न.प. प्रथमसिटीझन फिडबॅक गटात मूल नगरपरिषद प्रथम स्वच्छ सर्वेक्षणातील पश्चिम झोनमधून सिटीझन फिडबॅक गटात मूल नगरपरिषदला प्रथम मानांकन मिळाला. या नगरपरिषदला २०१८ मध्ये ४८, २०१९ मध्ये तिसरा, २०२० मध्ये ११ आणि २०२१ मध्ये २३ वा मानांकन मिळाला आहे.

सावलीने केली प्रगतीसावली नगरपंचायतीने गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली कामगीरी केली. मागील वर्षी ३२३ असा स्कोअर होता. यंदा मोहिम उत्तम राबविल्याने १३९ झाला आहे.  त्यामुळे दिल्ली येथे मुख्याधिकारी मनिषा वझाडे यांना पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळाली.

बल्लारपूरही अव्वलबल्लारपूर नगरपरिषदनेही स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबवून सस्टेनेबल शहर गटातून पहिला क्रमांक मिळविला. नगराध्यक्ष हरिश शर्मा व मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. 

स्वच्छता मोहीम राबविण्याकडे मनपाने विशेष लक्ष दिले. त्यामुळे हे यश मिळाले.  विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना केंद्रीय निकषानुसार मोहीम राबविण्यात आली. हा सन्मान महानगरपालिकेचा नव्हे, तर सर्व चंद्रपूरकरांचा आहे.–राखी कंचर्लावर, महापौर, चंद्रपूर

स्वच्छ सर्वेक्षणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे चंद्रपूरला सर्वेक्षणानुसार थ्री स्टार मिळाले. स्वच्छता मोहीम पुन्हा प्रभावीपणे राबविण्यात येईल.  मनपाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सहकार्यामुळे शहराला थ्री स्टार श्रेणी प्राप्त होऊ शकली.-राजेश मोहिते, मनपा आयुक्त, चंद्रपूर

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान