शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

दुग्ध उत्पादनात धवलक्रांती घडविण्याची चंद्रपूरला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:46 IST

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी हा प्रकल्प याच प्रयत्नांचा भाग असून जिल्ह्यात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : अधिकाऱ्यांनी योजनांची अंमलबजावणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी हा प्रकल्प याच प्रयत्नांचा भाग असून जिल्ह्यात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे. अधिकाऱ्यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना. अहीर म्हणाले, सध्या जिल्ह्यात १५ हजार लीटर दुध संकलनाचे काम सुरु असून यामध्ये उतरोत्तर वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी व दूध उत्पादक संकलन केंद्रातील संचालकांच्या समस्या सोडविण्याकडेही लक्ष दिले जात आहे. मात्र, विविध खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी.जिल्ह्यात दुधाळू जनावरांच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुधन विविध शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करून गरजू शेतकºयांना लाभ मिळवून दिला पाहिजे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रयत्न करावे, याकडे ना. अहीर यांनी लक्ष वेधले. यावेळी दुधातील फॅटविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मुद्रा योजनेमधून कर्ज उपलब्ध करावे, असे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले. केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन देण्याचा विक्रम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.सर्व बँकांनी याबाबतीत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच ज्या ठिकाणी महिलांकडून कर्जाची मागणी झाली. तिथे प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याविषयी चर्चा झाली.ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांना कृषिपूरक योजनेतून विकास करता येतो. त्यासाठी तालुका, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात कशी स्थिती आहे, यासंदर्भातही आढावा बैठकीत चर्चा झाली.गरजूंना लाभ द्याकेंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील शेतकºयांना जोड व्यवसाय मिळावा, यासाठी दुग्ध व्यवसायाला महत्त्व देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि पूरक व्यवसाय उभारण्यास बँकांनी अडवणूक करू नये, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. या आढावा बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर