शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

दुग्ध उत्पादनात धवलक्रांती घडविण्याची चंद्रपूरला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:46 IST

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी हा प्रकल्प याच प्रयत्नांचा भाग असून जिल्ह्यात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : अधिकाऱ्यांनी योजनांची अंमलबजावणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी हा प्रकल्प याच प्रयत्नांचा भाग असून जिल्ह्यात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे. अधिकाऱ्यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना. अहीर म्हणाले, सध्या जिल्ह्यात १५ हजार लीटर दुध संकलनाचे काम सुरु असून यामध्ये उतरोत्तर वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदर डेअरी व दूध उत्पादक संकलन केंद्रातील संचालकांच्या समस्या सोडविण्याकडेही लक्ष दिले जात आहे. मात्र, विविध खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी.जिल्ह्यात दुधाळू जनावरांच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पशुधन विविध शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार करून गरजू शेतकºयांना लाभ मिळवून दिला पाहिजे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रयत्न करावे, याकडे ना. अहीर यांनी लक्ष वेधले. यावेळी दुधातील फॅटविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मुद्रा योजनेमधून कर्ज उपलब्ध करावे, असे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले. केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेमध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन देण्याचा विक्रम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.सर्व बँकांनी याबाबतीत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच ज्या ठिकाणी महिलांकडून कर्जाची मागणी झाली. तिथे प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याविषयी चर्चा झाली.ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांना कृषिपूरक योजनेतून विकास करता येतो. त्यासाठी तालुका, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात कशी स्थिती आहे, यासंदर्भातही आढावा बैठकीत चर्चा झाली.गरजूंना लाभ द्याकेंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील शेतकºयांना जोड व्यवसाय मिळावा, यासाठी दुग्ध व्यवसायाला महत्त्व देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि पूरक व्यवसाय उभारण्यास बँकांनी अडवणूक करू नये, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. या आढावा बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर