शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात चंद्रपूर-गडचिरोलीतच सर्वाधिक बळी 

By राजेश मडावी | Updated: May 17, 2023 16:46 IST

Chandrapur News २०१९ ते २०२२-२३ या चार वर्षांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातच सर्वाधिक व्यक्तींचा बळी गेल्याचे वास्तव वन विभागाच्या अहवालातून पुढे आले.

राजेश मडावीचंद्रपूर : राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५० अभयारण्ये व २३ संवर्धन राखीव अशा एकूण ७९ संरक्षित क्षेत्रात वन्यजीव व्यवस्थापनात अनेक सुधारणा झाल्या. मात्र, मानव व वन्यजीव संघर्षातून नागरिकांचे बळी जाण्याच्या घटनांची तीव्रता संपली नाही. २०१९ ते २०२२-२३ या चार वर्षांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातच सर्वाधिक व्यक्तींचा बळी गेल्याचे वास्तव वन विभागाच्या अहवालातून पुढे आले. आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा शिवारात संचार वाढू लागल्याने यंदाही हा धोका कायम आहे.

राज्याच्या वन विभागाने ‘मानव-वन्यजीव संघर्ष व उपाययोजना’ नावाची एक अधिकृत टिपणी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या चार वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यूमुखी पडलेल्या २२ जिल्हानिहाय घटनांची नोंद केली. त्यानुसार, चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांत सर्वाधिक व्यक्तींचे बळी गेले. २०१९ मध्ये राज्यात ४७ जणांचा मृत्यू झाला. त्यात चंद्रपूरच्या ४७ बळींचा समावेश होता. २०२०-२१ मध्ये राज्यात ८२ व चंद्रपुरात ३२ व गडचिरोली ९, २०२१-२२ मध्ये राज्यात ८६ तर चंद्रपुरात ४६, गडचिरोली १५ आणि २०२२-२३ मध्ये राज्यात ९० तर चंद्रपुरातील ५१ जणांचा बळी गेला. २०२२-२३ मध्ये बळी गेलेल्या राज्यातील ९० नागरिकांत चंद्रपूरचे ५१ व गडचिरोलीच्या २५ जणांचा समावेश आहे. त्यातही वाघाच्या हल्ल्यात २०२२ मध्ये चंद्रपूर ४५ तर गडचिरोलीत २४ अशा एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे वाघ-बिबट पाहणे पर्यटकांना सुखावणारे असेलही; पण मानव-वन्यजीव संघर्ष अत्यंत टोकदार झाला आहे. 

संघर्षाचे असे केले वर्गीकरण

राज्य वन विभागाने मानव-वन्यजीव संघर्षाचे वन्यप्राण्यांच्या प्रकारानुसार, जिल्ह्यांना वर्गीकृत केले. मानव -वाघ संघर्ष (चंद्रपूर जिल्हा) मानव- इतर मांस भक्षक व तृण भक्षक (संपूर्ण राज्य) व मानव-जंगली हत्ती (सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली व गोंदिया) असे  तीन संघर्ष नमुद करून या तिन्ही प्रकारच्या मानव-वन्यजीव संघर्षाला कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत, असा दावा केला आहे.

टॅग्स :Tigerवाघ