शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात चंद्रपूर-गडचिरोलीतच सर्वाधिक बळी 

By राजेश मडावी | Updated: May 17, 2023 16:46 IST

Chandrapur News २०१९ ते २०२२-२३ या चार वर्षांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातच सर्वाधिक व्यक्तींचा बळी गेल्याचे वास्तव वन विभागाच्या अहवालातून पुढे आले.

राजेश मडावीचंद्रपूर : राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५० अभयारण्ये व २३ संवर्धन राखीव अशा एकूण ७९ संरक्षित क्षेत्रात वन्यजीव व्यवस्थापनात अनेक सुधारणा झाल्या. मात्र, मानव व वन्यजीव संघर्षातून नागरिकांचे बळी जाण्याच्या घटनांची तीव्रता संपली नाही. २०१९ ते २०२२-२३ या चार वर्षांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातच सर्वाधिक व्यक्तींचा बळी गेल्याचे वास्तव वन विभागाच्या अहवालातून पुढे आले. आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा शिवारात संचार वाढू लागल्याने यंदाही हा धोका कायम आहे.

राज्याच्या वन विभागाने ‘मानव-वन्यजीव संघर्ष व उपाययोजना’ नावाची एक अधिकृत टिपणी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या चार वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यूमुखी पडलेल्या २२ जिल्हानिहाय घटनांची नोंद केली. त्यानुसार, चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांत सर्वाधिक व्यक्तींचे बळी गेले. २०१९ मध्ये राज्यात ४७ जणांचा मृत्यू झाला. त्यात चंद्रपूरच्या ४७ बळींचा समावेश होता. २०२०-२१ मध्ये राज्यात ८२ व चंद्रपुरात ३२ व गडचिरोली ९, २०२१-२२ मध्ये राज्यात ८६ तर चंद्रपुरात ४६, गडचिरोली १५ आणि २०२२-२३ मध्ये राज्यात ९० तर चंद्रपुरातील ५१ जणांचा बळी गेला. २०२२-२३ मध्ये बळी गेलेल्या राज्यातील ९० नागरिकांत चंद्रपूरचे ५१ व गडचिरोलीच्या २५ जणांचा समावेश आहे. त्यातही वाघाच्या हल्ल्यात २०२२ मध्ये चंद्रपूर ४५ तर गडचिरोलीत २४ अशा एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे वाघ-बिबट पाहणे पर्यटकांना सुखावणारे असेलही; पण मानव-वन्यजीव संघर्ष अत्यंत टोकदार झाला आहे. 

संघर्षाचे असे केले वर्गीकरण

राज्य वन विभागाने मानव-वन्यजीव संघर्षाचे वन्यप्राण्यांच्या प्रकारानुसार, जिल्ह्यांना वर्गीकृत केले. मानव -वाघ संघर्ष (चंद्रपूर जिल्हा) मानव- इतर मांस भक्षक व तृण भक्षक (संपूर्ण राज्य) व मानव-जंगली हत्ती (सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली व गोंदिया) असे  तीन संघर्ष नमुद करून या तिन्ही प्रकारच्या मानव-वन्यजीव संघर्षाला कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत, असा दावा केला आहे.

टॅग्स :Tigerवाघ