शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

चंद्रपुरात किसानपुत्रांचा ‘आत्मक्लेश’

By admin | Updated: October 3, 2016 00:44 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’चा संदेश दिला होता.

शेतकऱ्यांची दुर्दशा सरकारमुळे : स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणीचंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’चा संदेश दिला होता. मात्र, आजघडीला खेडे ओस पडू लागली आहेत. शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच असून शासनाचे धोरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन स्वामीनाथन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील किसानपुत्रांनी रविवारी जटपुरा गेट येथे ‘आत्मक्लेश’ आंदोलन केले. शेतकऱ्यांना गळफास ठरणारे कायदे रद्द केल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी कमाल जमीन धारणेचा कायदा रद्द करावा, अत्यावश्यक वस्तूंचा कायदा रद्द करावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, किसानपुत्रांना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत करावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. या आंदोलनात प्रा. विजय बदखल, नगरसेवक संदीप आवारी, प्रा. सुरेश चोपणे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख, उमाकांत धांडे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, नगरसेवक बंडू हजारे, नगरसेवक सचिन भोयर, पांडुरंग गावतुरे, प्रकाश कामडी, प्रा. माधव गुरनुले, प्रा. कमलाकर धानोरकर, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच अमोल ठाकरे, रविंद्र झाडे, किरण ढुमणे, संतोष ताजणे, भास्कर ताजने, किसन नागरकर, वसंता उमरे, देवेंद्र बेले, भाविक येरगुडे, प्रमोद काकडे सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. गावापासून दूर शासकीय सेवेत आणि खासगी व्यवसायात कार्यरत असलेल्या शेतकरीपुत्रांनी राज्यभरात कायदेशिर मार्गाने शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी मांडणे सुरू केले आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून चंद्रपुरात रविवारी भूमिपूत्र युवा संघ व भूमिपूत्र प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राजकीय, सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शविला. प्रास्ताविक प्रा. विजय बदखल यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आंदोलनात किसानपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जम्मू-काश्मिरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यशविस्तेसाठी लक्ष्मीकांत धानोरकर, अशोक सातपुते, प्रणय काकडे, अक्षय उरकुडे, हर्षल काकडे, प्रमोद उरकुडे, मनोज गोरे, पवन राजुरकर, विठ्ठल बलकी, रोशन आस्वले, दीपक उपरे, रूपेश उलमाले, संदीप जेऊरकर, महेश गुंजेकर, प्रदीप उमरे, प्रमोद निखाडे, प्रा. संजय गोरे, गजानन उमरे, अतुल जेनेकर, रूपेश ठेंगणे, किशोर तुराणकर, भुषण महाकूलकर, सचिन गौरकार, प्रदीप पिंपळशेंडे, राकेश लांडे, राजेश ताजने, विनोद गोवारदिपे, अमोल बोबडे, आकाश लांबट, हितेश गोहोकार यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)