शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

चंद्रपुरात किसानपुत्रांचा ‘आत्मक्लेश’

By admin | Updated: October 3, 2016 00:44 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’चा संदेश दिला होता.

शेतकऱ्यांची दुर्दशा सरकारमुळे : स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणीचंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’चा संदेश दिला होता. मात्र, आजघडीला खेडे ओस पडू लागली आहेत. शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच असून शासनाचे धोरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन स्वामीनाथन आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील किसानपुत्रांनी रविवारी जटपुरा गेट येथे ‘आत्मक्लेश’ आंदोलन केले. शेतकऱ्यांना गळफास ठरणारे कायदे रद्द केल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी कमाल जमीन धारणेचा कायदा रद्द करावा, अत्यावश्यक वस्तूंचा कायदा रद्द करावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, किसानपुत्रांना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत करावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. या आंदोलनात प्रा. विजय बदखल, नगरसेवक संदीप आवारी, प्रा. सुरेश चोपणे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख, उमाकांत धांडे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, नगरसेवक बंडू हजारे, नगरसेवक सचिन भोयर, पांडुरंग गावतुरे, प्रकाश कामडी, प्रा. माधव गुरनुले, प्रा. कमलाकर धानोरकर, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच अमोल ठाकरे, रविंद्र झाडे, किरण ढुमणे, संतोष ताजणे, भास्कर ताजने, किसन नागरकर, वसंता उमरे, देवेंद्र बेले, भाविक येरगुडे, प्रमोद काकडे सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. गावापासून दूर शासकीय सेवेत आणि खासगी व्यवसायात कार्यरत असलेल्या शेतकरीपुत्रांनी राज्यभरात कायदेशिर मार्गाने शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी मांडणे सुरू केले आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून चंद्रपुरात रविवारी भूमिपूत्र युवा संघ व भूमिपूत्र प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राजकीय, सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शविला. प्रास्ताविक प्रा. विजय बदखल यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आंदोलनात किसानपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जम्मू-काश्मिरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यशविस्तेसाठी लक्ष्मीकांत धानोरकर, अशोक सातपुते, प्रणय काकडे, अक्षय उरकुडे, हर्षल काकडे, प्रमोद उरकुडे, मनोज गोरे, पवन राजुरकर, विठ्ठल बलकी, रोशन आस्वले, दीपक उपरे, रूपेश उलमाले, संदीप जेऊरकर, महेश गुंजेकर, प्रदीप उमरे, प्रमोद निखाडे, प्रा. संजय गोरे, गजानन उमरे, अतुल जेनेकर, रूपेश ठेंगणे, किशोर तुराणकर, भुषण महाकूलकर, सचिन गौरकार, प्रदीप पिंपळशेंडे, राकेश लांडे, राजेश ताजने, विनोद गोवारदिपे, अमोल बोबडे, आकाश लांबट, हितेश गोहोकार यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)