शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल @ ९२.१०

By admin | Updated: May 28, 2015 00:06 IST

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ....

ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरी विद्यार्थ्यांवर मात : मूल तालुका आघाडीवर तर वरोरा माघारलाचंद्रपूर : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ‘आॅन लाईन’ घोषित करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९२.१० इतकी आहे. २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २५ हजार १३७ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यात २३ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मूल तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.६५ टक्के लागला आहे. तर ८९.९९ टक्केवारीसह वरोरा तालुका पंधराव्या क्रमांकावर आहे. गतवर्षी शहरी विद्यार्थ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांवर मात केली होती. यंदा तालुकानिहाय निकालाची टक्केवारी बघितल्यास ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी निकालात सरशी घेतल्याचे दिसून येते. चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी या शहरीभागापेक्षा गोंडपिपरी, मूल, पोंभूर्णा, जिवती सारख्या ग्रामीण तालुक्यांनी चांगला निकाल दिला आहे. विज्ञान शाखेतून ८ हजार ७२० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ८ हजार ७०७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ८ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.३२ इतकी आहे. यामध्ये ३२० विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार ०९ प्रथम, ५ हजार ६४५ द्वितीय, तर ४१३ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.कला शाखेतून १३ हजार १६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १३ हजार १५७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ११ हजार ७६७ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८९.४४ इतकी आहे. यामध्ये २३४ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार ९२३ प्रथम, ७ हजार ६१५ द्वितीय तर ९९५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून एकूण १ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षेसासाठी नोंदणी केली होती. पैकी १ हजार ७८८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात १ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ९२.२८ इतकी आहे. यामध्ये १२७ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५७७ प्रथम, ८३६ द्वितीय तर ११० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेतून एकूण १ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी १ हजार ४८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९०.६४ इतकी आहे. १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५३२ प्रथम, ७७६ द्वितीय तर २३ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. (स्थानिक प्रतिनिधी)निकालात विज्ञान शाखा अव्वल४यावर्षीच्या बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल इतर शाखेच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. विज्ञान शाखेतून ८ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी टक्केवारी ९६.३२ इतकी आहे. कला शाखेतून ११ हजार ७६७ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८९.८४ इतकी आहे. वाणिज्य शाखेतून १ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ९२.२८ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेच्या निकालाची टक्केवारी ९०.६४ इतकी आहे. यंदाही मुलींनी मारली बाजीइयत्ता बारावीच्या निकालात यंदाही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.१२ इतकी असून मुलांच्या निकालाची टक्केवारी ९०.०७ इतकी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये १२ हजार ६०३ मुलांचा तर १२ हजार ५६६ मुलींचा समावेश होता. एकूण २५ हजार १३७ विद्याथी परीक्षेला सामोरे गेले. यामध्ये १२ हजार ५६९ मुलांचा तर १२ हजार ५५८ मुलींचा समावेश होता. या परीक्षेत २३ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ११ हजार ३३० मुलांनी तर ११ हजार ६२० मुलींनी बाजी मारली. शून्य टक्के निकालदेणारी शाळायावर्षीचा निकाल चांगला लागला आहे. मागील वर्षी ८७.६६ टक्के निकाल लागला होता. यंदा तब्बल ९२.१० टक्के एवढा निकाल लागला आहे. तरीही जिल्ह्यातील चिचपल्ली येथील सम्राट अशोक हायस्कुल अ‍ॅण्ड ज्यू. कॉलेज, नागाळाने यंदाही शून्य टक्के निकाल दिला आहे. गेल्या वर्षीही या शाळेने शुन्य टक्के निकाल दिला होता. यावर्षीही शाळेची शुन्य टक्क़े निकालाची परंपरा कायम राहिली आहे.