शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल @ ९२.१०

By admin | Updated: May 28, 2015 00:06 IST

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल ....

ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरी विद्यार्थ्यांवर मात : मूल तालुका आघाडीवर तर वरोरा माघारलाचंद्रपूर : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ‘आॅन लाईन’ घोषित करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९२.१० इतकी आहे. २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी २५ हजार १३७ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यात २३ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मूल तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.६५ टक्के लागला आहे. तर ८९.९९ टक्केवारीसह वरोरा तालुका पंधराव्या क्रमांकावर आहे. गतवर्षी शहरी विद्यार्थ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांवर मात केली होती. यंदा तालुकानिहाय निकालाची टक्केवारी बघितल्यास ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी निकालात सरशी घेतल्याचे दिसून येते. चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी या शहरीभागापेक्षा गोंडपिपरी, मूल, पोंभूर्णा, जिवती सारख्या ग्रामीण तालुक्यांनी चांगला निकाल दिला आहे. विज्ञान शाखेतून ८ हजार ७२० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ८ हजार ७०७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ८ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९६.३२ इतकी आहे. यामध्ये ३२० विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार ०९ प्रथम, ५ हजार ६४५ द्वितीय, तर ४१३ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.कला शाखेतून १३ हजार १६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १३ हजार १५७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात ११ हजार ७६७ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८९.४४ इतकी आहे. यामध्ये २३४ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, २ हजार ९२३ प्रथम, ७ हजार ६१५ द्वितीय तर ९९५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून एकूण १ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षेसासाठी नोंदणी केली होती. पैकी १ हजार ७८८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यात १ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ९२.२८ इतकी आहे. यामध्ये १२७ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५७७ प्रथम, ८३६ द्वितीय तर ११० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेतून एकूण १ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी १ हजार ४८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९०.६४ इतकी आहे. १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यता, ५३२ प्रथम, ७७६ द्वितीय तर २३ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. (स्थानिक प्रतिनिधी)निकालात विज्ञान शाखा अव्वल४यावर्षीच्या बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा निकाल इतर शाखेच्या तुलनेत अव्वल ठरला आहे. विज्ञान शाखेतून ८ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी टक्केवारी ९६.३२ इतकी आहे. कला शाखेतून ११ हजार ७६७ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८९.८४ इतकी आहे. वाणिज्य शाखेतून १ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ९२.२८ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेच्या निकालाची टक्केवारी ९०.६४ इतकी आहे. यंदाही मुलींनी मारली बाजीइयत्ता बारावीच्या निकालात यंदाही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.१२ इतकी असून मुलांच्या निकालाची टक्केवारी ९०.०७ इतकी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २५ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये १२ हजार ६०३ मुलांचा तर १२ हजार ५६६ मुलींचा समावेश होता. एकूण २५ हजार १३७ विद्याथी परीक्षेला सामोरे गेले. यामध्ये १२ हजार ५६९ मुलांचा तर १२ हजार ५५८ मुलींचा समावेश होता. या परीक्षेत २३ हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ११ हजार ३३० मुलांनी तर ११ हजार ६२० मुलींनी बाजी मारली. शून्य टक्के निकालदेणारी शाळायावर्षीचा निकाल चांगला लागला आहे. मागील वर्षी ८७.६६ टक्के निकाल लागला होता. यंदा तब्बल ९२.१० टक्के एवढा निकाल लागला आहे. तरीही जिल्ह्यातील चिचपल्ली येथील सम्राट अशोक हायस्कुल अ‍ॅण्ड ज्यू. कॉलेज, नागाळाने यंदाही शून्य टक्के निकाल दिला आहे. गेल्या वर्षीही या शाळेने शुन्य टक्के निकाल दिला होता. यावर्षीही शाळेची शुन्य टक्क़े निकालाची परंपरा कायम राहिली आहे.