शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

चंद्रपूर जिल्ह्याला सरकारी कापूस खरेदीचा मुहूर्त मिळेना

By admin | Updated: November 18, 2015 01:09 IST

शेतकऱ्यांच्या घरात आज मोठ्या प्रमाणात कापूस भरून आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकूण आपली आर्थिक गरज भागविली.

शेतकरी हतबल : लाख मोलाचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या घशातगोवरी : शेतकऱ्यांच्या घरात आज मोठ्या प्रमाणात कापूस भरून आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकूण आपली आर्थिक गरज भागविली. सरकारी कापूस संकलन केंद्र आज ना उद्या सुरू होईल या आशेवर शेतकरी आहे. कापसाचा हंगाम भरात आला असताना एकही कापूस केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या चंद्रपूर जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याच्या खरेदीसाठी शासकीय यंत्रणाच हतबल झाली काय? असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ नोव्हेंबरला नागपुरात सरकारी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू होईल अशी आस शेतकऱ्यांना होती, मात्र मोजक्याच ठिकाणी सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू झाले. परिणामी विदर्भ प्रदेशात कापूस उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात अजुनपर्यंत सरकारी कापूस खरेदी सुरु झाली नाही. त्यामुळे नाईलाजाने कापूस कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी आर्थिक अडचणीत गेली. दिवाळीला अख्खा आसमंत दिव्यांच्या लख्ख प्रकाशात उजळून निघाला असताना शेतकऱ्यांच्या घरी मात्र अंधार अधिकच गडद झाला होता. दिवाळी वर्षातला सर्वात मोठा सण असतानाही ती शेतकऱ्यांना पैशाअभावी साजरा करता आला नाही. राज्यात सरकारी कापूस खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यातील कापूस संकलन केंद्र सुरू होणार होते. त्यात कापसाच्या (वणी झोन) क्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हे एकमेव कापूस संकलन केंद्र सुरू करण्याचा शासनाचा मानस होता.जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, महाकुर्ला, वरोरा, माढेळी या पाच ठिकाणी शासकीय कापूस खरेदी सुरू केली जाते. मात्र दिवाळी उलटून गेली तरी अद्यापही शासनाने कापूस खरेदीचा श्रीगणेशा केला नाही. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर एकही राजकीय नेता बोलायला तयार नाही. शेतात दिवस-रात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी पूरता काकुळतीला आला आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेट कापसाच्या पिकांवर चालतो. परंतु शासनाने कापूस पिकाला तोकडा हमीभाव जाहीर केला आहे. एवढ्या कमी दरात शेतकऱ्यांनी कापसावर केलेला खर्चही भरून निघणार नाही. मग नुकसान सहन करून कापूस विकायचा काय? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना दिवस-रात्र छळतो आहे. (वार्ताहर)