शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

चंद्रपूर जिल्हा अ‌वैध धंद्यासाठी ‌‘सेफ झाेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST

चंद्रपूर : गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर झालेल्या अफलातून कारवायातून चंद्रपूर जिल्हा अवैध धंद्यासाठी ‘सेफ झोन’ असल्याचेच ...

चंद्रपूर : गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर झालेल्या अफलातून कारवायातून चंद्रपूर जिल्हा अवैध धंद्यासाठी ‘सेफ झोन’ असल्याचेच दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसातील कारवायांवर दृष्टी फिरविल्यास चंद्रपूरची वाटचाल कोणत्या दिशेने चालली ही बाब लक्षात येणारी आहे. हे सर्वकाही वरूनच मॅनेज झाल्यामुळे सुरू असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते यावर कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ने अवैधरीत्या नदीघाटातून सुरू असलेल्या वाळू तस्करीकडे वृत्तातून लक्ष वेधले होते. यानंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला. येथील उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी भल्या पहाटे घुग्घुस परिसरातील वर्धा नदीच्या घाटावर धाड घातली. एक दोन नव्हे रेती तस्करी करणारे तब्बल २४ ट्रॅक्टर पकडले. यावरून चंद्रपूर जिल्ह्यात दररोज रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असेल याचा अंदाज येतो. मात्र स्वत:हून कारवाईस प्रशासन धजावत नाही, ही वस्तुस्थिती यानिमित्ताने पुढे आली आहे.

दरम्यानच्या काळात ‌‌‘लोकमत’ने ‘विशिष्ट साखळीच्या माध्यमातूनच जिल्ह्यात वाहते अवैध दारूचे पाट’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून वास्तव जनतेपुढे आणले होते. मंगळवारी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूरकडून आलेली दारूची सहा वाहने पकडल्याने या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. यामध्ये तब्बल ७९ लाखाचा दारूसाठा आढळला. एकीकडे ही कारवाई सुरू असताना त्याच रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील गंजवाॅर्ड परिसरातील एका फ्लॅटमधून ३२ लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त केला. जिल्ह्यात विविध भागात कोंबड्याच्या एका झुंजीवर लाखोचा जुगार खेळला जात आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. हे सर्व खुलेआम सुरू आहे. कुणाचाही वचक दिसत नाही.

उपरोक्त तीनही कारयावा संबंधित विभागाकडून होणे अपेक्षित होत्या. राजकीय पक्षाचे पदाधिकारी वा स्वत: लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरून कराव्या लागत आहे. याचा अर्थ काय समजावा, असा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला पडला आहे. याचे उत्तर गृहमंत्री देतील, अशी आशा चंद्रपूरची जनता बाळगून आहे.