शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

गटशिक्षणाधिकाऱ्यांविनाच सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्याचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आता पुन्हा संकट वाढल्यामुळे परीक्षेविनाच विद्यार्थ्यांना ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आता पुन्हा संकट वाढल्यामुळे परीक्षेविनाच विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे. असे असले तरी शाळांचा कारभार सुरू आहे. मात्र तालुकास्तरावरील शाळा तसेच शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वच्या सर्व पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभाग प्रभारींच्या भरोवश्यावर कारभार चालवित आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहे. तालुकानिहाय एक प्रमाणे जिल्ह्यात १५ गटशिक्षणाधिकारी असणे गरजेचे आहे विशेष म्हणजे, १५ ही पदे मंजूर आहे. मात्र एकाही तालुक्यात गटशिक्षणाधिकारीच नसून त्यांचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. हा प्रभारही सोपविताना काही ठिकाणी ज्येष्ठांकडे न देता काही ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता. यासंदर्भात विस्तार अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे निवेदनही दिले आहे. विशेष म्हणजे, दोन दोन प्रभार सांभाळताना विस्तार अधिकाऱ्यांना चांगलाच घाम सुटत आहे. विशेष म्हणजे, काही तालुक्यांमध्ये विस्तार अधिकारीही नाही. त्यांचा तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे आहे.

गट शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार सोपविताना संबंधित अधिकारी बीएड् असणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. प्रभारींच्या भरोवशावर कामे सुरू असल्यामुळे शैक्षणिक कामे मागे पडत असून, त्याचा शिक्षण विभागावर विपरित परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, यावर्षी शा‌ळा नियमित सुरूच झाल्या नाही. परिणामी ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर देण्यात आला. यात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन उपक्रमणही राबविले. स्वाध्याय, शिष्यवृत्ती अभ्यासक्रम अशा काही उपक्रमांचाही समावेश होता. मात्र हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न कमी पडत असल्याचे चित्र मागील वर्षभरात दिसून आले.

आता पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. पुढील सत्र केव्हा सुरू होणार हे कोरोना संकट गेल्यानंतर माहिती होणार आहे. मात्र शाळा, पटसंख्या, पुस्तक, गणवेश वितरण आदी शैक्षणिक कामे शिक्षण विभागाला करून ठेवावी लागणार आहे. मात्र महत्त्वाचे असलेले गटशिक्षणाधिकारीच पद रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ताण पडला आहे.