शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकाऱ्यांविनाच सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्याचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आता पुन्हा संकट वाढल्यामुळे परीक्षेविनाच विद्यार्थ्यांना ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आता पुन्हा संकट वाढल्यामुळे परीक्षेविनाच विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे. असे असले तरी शाळांचा कारभार सुरू आहे. मात्र तालुकास्तरावरील शाळा तसेच शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वच्या सर्व पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभाग प्रभारींच्या भरोवश्यावर कारभार चालवित आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहे. तालुकानिहाय एक प्रमाणे जिल्ह्यात १५ गटशिक्षणाधिकारी असणे गरजेचे आहे विशेष म्हणजे, १५ ही पदे मंजूर आहे. मात्र एकाही तालुक्यात गटशिक्षणाधिकारीच नसून त्यांचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. हा प्रभारही सोपविताना काही ठिकाणी ज्येष्ठांकडे न देता काही ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता. यासंदर्भात विस्तार अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे निवेदनही दिले आहे. विशेष म्हणजे, दोन दोन प्रभार सांभाळताना विस्तार अधिकाऱ्यांना चांगलाच घाम सुटत आहे. विशेष म्हणजे, काही तालुक्यांमध्ये विस्तार अधिकारीही नाही. त्यांचा तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे आहे.

गट शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार सोपविताना संबंधित अधिकारी बीएड् असणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. प्रभारींच्या भरोवशावर कामे सुरू असल्यामुळे शैक्षणिक कामे मागे पडत असून, त्याचा शिक्षण विभागावर विपरित परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, यावर्षी शा‌ळा नियमित सुरूच झाल्या नाही. परिणामी ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर देण्यात आला. यात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन उपक्रमणही राबविले. स्वाध्याय, शिष्यवृत्ती अभ्यासक्रम अशा काही उपक्रमांचाही समावेश होता. मात्र हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न कमी पडत असल्याचे चित्र मागील वर्षभरात दिसून आले.

आता पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. पुढील सत्र केव्हा सुरू होणार हे कोरोना संकट गेल्यानंतर माहिती होणार आहे. मात्र शाळा, पटसंख्या, पुस्तक, गणवेश वितरण आदी शैक्षणिक कामे शिक्षण विभागाला करून ठेवावी लागणार आहे. मात्र महत्त्वाचे असलेले गटशिक्षणाधिकारीच पद रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ताण पडला आहे.