शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

स्मशानभूमीच्या वादावरून आज चंद्रपूर बंदची हाक

By admin | Updated: February 4, 2016 00:58 IST

दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तिरावरील बंद स्मशानभूमीत पे्रत जाळण्याच्या प्रकरणावरून शहरातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

पुगलियांचे प्रशासनावर ताशेरे : देवतळे गटाचा आंदोलनातून काढता पायचंद्रपूर : दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तिरावरील बंद स्मशानभूमीत पे्रत जाळण्याच्या प्रकरणावरून शहरातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या गटाने ४ फेब्रुवारीला चंद्रपूर बंदची हाक दिली आहे. तर, दुसरीकडे सिंधी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेत जाळण्याच्या घटनेशी समाजाचा संबंध नाही, असे सांगत वाद टाळण्याची भूमिका घेतली आहे. ही बंदची तयारी सुरू असतानाच जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देवून या बंदशी जिल्हा काँगे्रस कमेटीचा संबंध नाही, असे सांगत राजकीय वाद ओढावून घेतला आहे. बालाजी मंदीर उभारण्यात आलेल्या या इरई नदीच्या किनाऱ्यावरील स्मशानभूमीत काल मंगळवारी स्मशानभूमीचे कुलूप तोडून पोलीस बंदोबस्तात प्रेत जाळण्यात आले होते. हा प्रकार दंडूकेशाहीचा प्रत्यय देणारा असून धार्मिक भावना दुखाविणारा असल्याचे सांगत ४ फेब्रुवारीला काँग्रेसच्या गटाने बंदचे आवाहन केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)बंदशी संबंध नाही - प्रकाश देवतळेया बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस काढून गुरूवारच्या बंदशी जिल्हा काँग्रेस कमेटीचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. या बंदसंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा झाली नाही. नागरिकांच्या कोणत्याही भावना दुखविण्याचा हेतू पक्षाचा नाही, असेही देवतळे यांनी म्हटले आहे. झाले ते चुकीचेच - मेघराज बबनानी सिंधी पंचायत समितीचे सचिव मेघराज बबनानी यांनी प्रसार माध्यामांना दिलेल्या मुलाखतीमध्ये दाताळा स्मशानभूमीत प्रेत जाळण्याच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, समाजाच्या पंचायतीच्या विनापरवानगीने हे घडले आहे. त्याचा समाजाशी संबंध नाही. गावकऱ्यांनी बंदी घातल्यापासून आम्ही सर्व समाजबांधव मोक्षधामवरच अंत्यसंस्कार करतो. दाताळा स्मशानभूमीला कुलूप होते, बंदचा फलकही लावला होता, तरीही तेथे प्रेत कसे जाळण्यात आले, याबद्दल आपणास माहीत नाही. आम्हाला वादविवाद, तंटा नको आहे, समाजाची अशा कृत्याला परवानगी नाही.