शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूृर-आष्टी रस्ता होणार चौपदरी राष्ट्रीय महामार्ग

By admin | Updated: October 1, 2015 01:16 IST

चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या बल्लारपूर-बामणी- गोंडपिपरी-आष्टी या राज्य मार्गाला नवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे.

मुनगंटीवारांच्या प्रयत्नाला यश : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाची मान्यताचंद्रपूर : चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या बल्लारपूर-बामणी- गोंडपिपरी-आष्टी या राज्य मार्गाला नवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने सुधीर मुनगंटीवार यासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १८ सप्टेंबर रोजी याबाबत कळविले आहे. नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा या भागात तात्काळ आणि प्रभावी दळणवळण सेवा पुरविता यावी यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.चंद्रपूर-बल्लारपूर-गोंडपिपरी-आष्टी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यासोबतच चौपदरीकरण करण्याची मागणीही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्रालयाकडे सातत्याने रेटली होती. ८ आॅगस्ट २०१४ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटून ना. मुनगंटीवार यांनी या संदर्भातील प्रस्ताव आणि फाईल त्यांच्याकडे सादर केली होती. मागील अनेक वर्षांपासून ना. मुनगंटीवार ही मागणी मांडत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर शहरात झालेल्या जाहीर सभेत त्यांच्या मागणीवरून ना. गडकरी यांनी सदर रस्त्याला महामागार्चा दर्जा देत चौपदरीकरण करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्या आश्वासनाची आठवण ठेवून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू ठेवला होता. मागील दीड महिन्यांपूर्वी चंद्रपूरच्या बांधकाम विभागानेही या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयालाला पाठिवला होता.या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे चंद्रपूर-अहेरी हा प्रवासाचा वेळ कमी होणार असून नक्षलवाद कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा वाढली आहे. गडचिरोली जिल्हा आदिवसीबहूल व नक्षलग्रस्तही आहे. दळणवळणाची साधने अपुरी असल्याने उद्योगातही मागे आहे. या मार्गामुळे औद्योगिक क्षेत्रालासुध्दा प्रोत्साहन मिळणार आहे. भविष्यात या क्षेत्रातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या दोन्ही जिल्ह्यातील दळणवळणाच्या आणि विकासाच्या दृष्टीने सदर रस्त्याला राष्ट्रीय महामागार्चा दर्जा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)