शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

चंद्रपूृर-आष्टी रस्ता होणार चौपदरी राष्ट्रीय महामार्ग

By admin | Updated: October 1, 2015 01:16 IST

चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या बल्लारपूर-बामणी- गोंडपिपरी-आष्टी या राज्य मार्गाला नवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे.

मुनगंटीवारांच्या प्रयत्नाला यश : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाची मान्यताचंद्रपूर : चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या बल्लारपूर-बामणी- गोंडपिपरी-आष्टी या राज्य मार्गाला नवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने सुधीर मुनगंटीवार यासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १८ सप्टेंबर रोजी याबाबत कळविले आहे. नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा या भागात तात्काळ आणि प्रभावी दळणवळण सेवा पुरविता यावी यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.चंद्रपूर-बल्लारपूर-गोंडपिपरी-आष्टी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यासोबतच चौपदरीकरण करण्याची मागणीही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्रालयाकडे सातत्याने रेटली होती. ८ आॅगस्ट २०१४ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटून ना. मुनगंटीवार यांनी या संदर्भातील प्रस्ताव आणि फाईल त्यांच्याकडे सादर केली होती. मागील अनेक वर्षांपासून ना. मुनगंटीवार ही मागणी मांडत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर शहरात झालेल्या जाहीर सभेत त्यांच्या मागणीवरून ना. गडकरी यांनी सदर रस्त्याला महामागार्चा दर्जा देत चौपदरीकरण करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्या आश्वासनाची आठवण ठेवून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू ठेवला होता. मागील दीड महिन्यांपूर्वी चंद्रपूरच्या बांधकाम विभागानेही या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयालाला पाठिवला होता.या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे चंद्रपूर-अहेरी हा प्रवासाचा वेळ कमी होणार असून नक्षलवाद कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा वाढली आहे. गडचिरोली जिल्हा आदिवसीबहूल व नक्षलग्रस्तही आहे. दळणवळणाची साधने अपुरी असल्याने उद्योगातही मागे आहे. या मार्गामुळे औद्योगिक क्षेत्रालासुध्दा प्रोत्साहन मिळणार आहे. भविष्यात या क्षेत्रातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या दोन्ही जिल्ह्यातील दळणवळणाच्या आणि विकासाच्या दृष्टीने सदर रस्त्याला राष्ट्रीय महामागार्चा दर्जा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)