शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

प्रशासनाचा करंटेपणा; चंद्रपुरातील पुरातन विहिरी गडप होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 10:11 AM

चंद्रपूरसह जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक पुरातन विहिरींच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्नच केले नाही. परिणामी, पायऱ्यांच्या पुरातन विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देगोंडकालीन जलनितीपासून घेतला नाही धडा

राजेश मडावी

चंद्रपूर : चंद्रपुरातील गोंडराजांनी स्वतंत्र जलधोरण तयार करून अनेक तलाव व विहिरी खोदल्या. परंतु, सद्यस्थिती उपयोगी येऊ शकतील अशा चंद्रपूरसह जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक पुरातन विहिरींच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्नच केले नाही. परिणामी, पायऱ्यांच्या पुरातन विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात पायऱ्या असलेल्या अनेक ऐतिहासिक विहिरी आजही सुस्थितीत आहेत. चंद्रपुरातील बाबूपेठ येथील आणि पोंभुर्णा येथे राजराजेश्वर मंदिर परिसरात पायऱ्या असलेली विहीर अत्यंत नावीण्यपूर्ण आहे. या विहिरींचे स्थापत्यशास्त्र समजून घेण्यासाठी राज्यभरातील अभ्यास येतात. आहे. काही विहिरींत खाली उतरून पाणी पिण्यासाठी पायऱ्या आहेत. जिल्ह्यात २५ पेक्षा अधिक विहिरी अशंत: चांगल्या अवस्थेत आहेत. परंतु, प्रशासनाचे असेच दुर्लक्ष राहिल्यास त्या लवकरच गडप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बहुतांश विहिरींचे गुगल मॅपिंग

बारव बचाव आंदोलनाचे प्रणेते रोहन काळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २० पुरातन विहिरींचे गुगल मॅपिंग केले. आता या विहिरी जगाच्या नकाशावर आल्या. कुणालाही या विहिरी गुगलच्या माध्यमातून बघता येतात. दुर्लक्षित चिमूर तालुक्यातील दोन विहिरीही गुगलवर आल्या आहेत.

कुठे आहेत पुरातन विहिरी ?

चंद्रपूर, भद्रावती, नागभीड, चिमूर, नागभीड, राजुरा, गोंडपिपरी, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व सावली तालुक्यात पुरातन विहिरी आहेत. यातील बहुतांश विहिरी वस्तीच्या मध्यभागी आहेत. परंतु, काही बुजल्या तर काही विहिरींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने खचल्या आहेत.

वरपांगी योजनांवर कोट्यवधींची उधळण

चंद्रपूर मनपा व जिल्हा प्रशासनाने प्राचीन विहिरींच्या संवर्धनासाठी काहीच पाऊल उचलले नाही. पाणी पुरवठ्याच्या वरपांगी योजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च होतो. परंतु, पुरातन विहिरींना काहीच महत्त्व नाही, असा निष्कर्ष काढून उपेक्षा सुरू केली जात आहे.

बाबूपेठात तीन मजली पायऱ्यांची विहीर

चंद्रपुरातील इको प्रो संस्थेने बाबूपेठ सोनामाता परिसरातील ६० फुट खोल गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहीर स्वच्छ केली. ही दुर्लक्षित विहीर सुमारे तीन मजली पायऱ्यांची आहे. इकाे प्रोने उत्साह दाखविताच मनपा माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी पुढे आली. मात्र, विहिरीच्या दीर्घकालीन सुरक्षेसाठी आर्थिक तरतूदच केली नाही.

चंद्रपुरातील पुरातन विहिरींचे एक वेगळेच स्थापत्यशास्त्र आहे. ते आधुनिक स्थापत्यशास्त्राला थक्क करेल, असे आहे. या विहिरी इतिहास म्हणून सुरक्षित ठेवायची स्थळे आहेतच. मात्र, प्रशासनाने त्या दैनंदिन वापरात आणण्यास सक्षम केल्या पाहिजे.

-डॉ. योगेश दुधपचारे, जलव्यवस्थापन अभ्यासक, चंद्रपूर

पुरातन विहिरींचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी जागृती व स्वच्छता मोहीम राबवितो. आधीच्या पूर्वजांनी पिण्याच्या पाण्यासाठी इतकी चांगली सुविधा तयार करून ठेवली. त्यामुळे प्रशासनाने ठोस धोरण तयार करून विहिरींचे संर्वधन करावे.

-बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो, चंद्रपूर

टॅग्स :SocialसामाजिकhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण