शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा करंटेपणा; चंद्रपुरातील पुरातन विहिरी गडप होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 10:16 IST

चंद्रपूरसह जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक पुरातन विहिरींच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्नच केले नाही. परिणामी, पायऱ्यांच्या पुरातन विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देगोंडकालीन जलनितीपासून घेतला नाही धडा

राजेश मडावी

चंद्रपूर : चंद्रपुरातील गोंडराजांनी स्वतंत्र जलधोरण तयार करून अनेक तलाव व विहिरी खोदल्या. परंतु, सद्यस्थिती उपयोगी येऊ शकतील अशा चंद्रपूरसह जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक पुरातन विहिरींच्या संवर्धनासाठी प्रशासनाने प्रयत्नच केले नाही. परिणामी, पायऱ्यांच्या पुरातन विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात पायऱ्या असलेल्या अनेक ऐतिहासिक विहिरी आजही सुस्थितीत आहेत. चंद्रपुरातील बाबूपेठ येथील आणि पोंभुर्णा येथे राजराजेश्वर मंदिर परिसरात पायऱ्या असलेली विहीर अत्यंत नावीण्यपूर्ण आहे. या विहिरींचे स्थापत्यशास्त्र समजून घेण्यासाठी राज्यभरातील अभ्यास येतात. आहे. काही विहिरींत खाली उतरून पाणी पिण्यासाठी पायऱ्या आहेत. जिल्ह्यात २५ पेक्षा अधिक विहिरी अशंत: चांगल्या अवस्थेत आहेत. परंतु, प्रशासनाचे असेच दुर्लक्ष राहिल्यास त्या लवकरच गडप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बहुतांश विहिरींचे गुगल मॅपिंग

बारव बचाव आंदोलनाचे प्रणेते रोहन काळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २० पुरातन विहिरींचे गुगल मॅपिंग केले. आता या विहिरी जगाच्या नकाशावर आल्या. कुणालाही या विहिरी गुगलच्या माध्यमातून बघता येतात. दुर्लक्षित चिमूर तालुक्यातील दोन विहिरीही गुगलवर आल्या आहेत.

कुठे आहेत पुरातन विहिरी ?

चंद्रपूर, भद्रावती, नागभीड, चिमूर, नागभीड, राजुरा, गोंडपिपरी, मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व सावली तालुक्यात पुरातन विहिरी आहेत. यातील बहुतांश विहिरी वस्तीच्या मध्यभागी आहेत. परंतु, काही बुजल्या तर काही विहिरींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने खचल्या आहेत.

वरपांगी योजनांवर कोट्यवधींची उधळण

चंद्रपूर मनपा व जिल्हा प्रशासनाने प्राचीन विहिरींच्या संवर्धनासाठी काहीच पाऊल उचलले नाही. पाणी पुरवठ्याच्या वरपांगी योजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च होतो. परंतु, पुरातन विहिरींना काहीच महत्त्व नाही, असा निष्कर्ष काढून उपेक्षा सुरू केली जात आहे.

बाबूपेठात तीन मजली पायऱ्यांची विहीर

चंद्रपुरातील इको प्रो संस्थेने बाबूपेठ सोनामाता परिसरातील ६० फुट खोल गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहीर स्वच्छ केली. ही दुर्लक्षित विहीर सुमारे तीन मजली पायऱ्यांची आहे. इकाे प्रोने उत्साह दाखविताच मनपा माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी पुढे आली. मात्र, विहिरीच्या दीर्घकालीन सुरक्षेसाठी आर्थिक तरतूदच केली नाही.

चंद्रपुरातील पुरातन विहिरींचे एक वेगळेच स्थापत्यशास्त्र आहे. ते आधुनिक स्थापत्यशास्त्राला थक्क करेल, असे आहे. या विहिरी इतिहास म्हणून सुरक्षित ठेवायची स्थळे आहेतच. मात्र, प्रशासनाने त्या दैनंदिन वापरात आणण्यास सक्षम केल्या पाहिजे.

-डॉ. योगेश दुधपचारे, जलव्यवस्थापन अभ्यासक, चंद्रपूर

पुरातन विहिरींचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी जागृती व स्वच्छता मोहीम राबवितो. आधीच्या पूर्वजांनी पिण्याच्या पाण्यासाठी इतकी चांगली सुविधा तयार करून ठेवली. त्यामुळे प्रशासनाने ठोस धोरण तयार करून विहिरींचे संर्वधन करावे.

-बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो, चंद्रपूर

टॅग्स :SocialसामाजिकhistoryइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण