शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर @ ४६.४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:26 IST

चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्हाच सध्या सूर्याच्या प्रकोपामुळे होरपळून निघत आहे. सूर्याने चंद्रपुरात रविवारी जणू उग्ररुपच धारण केले की काय, असे वाटत होते. तापनामाने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे.

ठळक मुद्देतापमानाने गाठला उच्चांकआतापर्यंतचे सर्वाधिक तापमान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्हाच सध्या सूर्याच्या प्रकोपामुळे होरपळून निघत आहे. सूर्याने चंद्रपुरात रविवारी जणू उग्ररुपच धारण केले की काय, असे वाटत होते. तापनामाने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. रविवारी चंद्रपुरातील तापमान ४६.४ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले. तप्त उन्हामुळे चंद्रपुरातील रस्ते आज दिवसभर ओस पडल्याचे दिसून आले.मागील पंधरवाड्यातच चंद्रपुरात सुर्याचा पारा ४५ अंशापर्यंत गेला होता. यापूर्वीच ४५.३, ४५.४, ४५.९ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून याचा जनजीवनावरही परिणाम पडत आहे. याशिवाय पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न तिव्रतेने उभा ठाकला आहे. ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. सर्वाहून अधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी महिना साधारण गेला. आणि मार्च महिन्यातही फारसे तापमान नव्हते. होळी झाल्यानंतर तापमानात किंचित वाढ झाली. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान घटले होते. सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण राहत असल्याने वातावरणात काही दिवस गारवा होता. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यापासून ऊन्ह तापू लागले. मागील पंधरवाड्यापासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. सातत्याने पारा ४५ अंशापार जात आहे. एप्रिल महिन्यात सुर्याने चंद्रपूरकरांची चांगलीच लाहीलाही केली. सूर्याचा हा प्रकोप असह्य होत आहे. सुर्याने अक्षरश: आग ओकणे सुरू केले आहे. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.रविवारी तर तापमानाने मर्यादाच ओलांडल्याचे दिसून आले. ४६.४ अंश सेल्सीयस तापमानाची चंद्रपुरात नोंद करण्यात आली. तर ब्रह्मपुरीत ४६ अंश सेल्सीयस तापमान नोंदविण्यात आले. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते रविवारी दुपारी ओस पडल्याचे दिसून आले. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. एकूणच नागरिकांनी उन्हाचा चांगलाच धसका घेतला आहे.मागील तीन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. पारा सातत्याने वाढत आहे. येणाऱ्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत. या वाढत्या तापमानामुळे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांनाही धोका निर्माण झाला आहे. ४७ ते ४९ अंश सेल्सीयस तापमानात पक्ष्यांना पाणी मिळाले नाही तर त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.वीज केंद्र, सिमेंट रस्त्यांमुळे तापमानात वाढचंद्रपुरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. चंद्रपूरला लागूनच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या ठिकाणी सातत्याने कोळसा जाळला जातो. त्यामुळे चंद्रपूरचे किमान तापमान वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय शहरात सिमेंटचे रस्तेही याला कारणीभूत आहेत. चंद्रपूर शहराबाहेर किमान तापमान कमी असते. त्यामुळे रात्री शहराबाहेर गारवा अनुभवास येतो. रविवारी चंद्रपूरचे किमान तापमान ३१.२ तर ब्रह्मपुरीचे २७.७ अंश सेल्सीयस होते.मे महिन्याची अनेकांना धास्तीएप्रिल महिन्यातच सुर्याने आग ओकणे सुरू केले आहे. तप्त सुर्यकिरणे असह्य होत आहेत. चंद्रपूरकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. एप्रिल महिन्यातच हे हाल आहेत तर पुढे मे महिन्यात कसे होईल, याचा धसका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आतापासून घेतला आहे. मे महिन्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा सामना कसा करावा, या चिंतेत चंद्रपूरकरांची झोप उडाली आहे.किमान तापमानही फोडतोय घामचंद्रपूरचे तापमान राज्यात सर्वाधिक असते, याचा अनुभव चंद्रपूरकरांनी अनेकवेळा घेतला आहे. हे कमाल तापमानाबाबत असते. मात्र मागील काही दिवसांपासून चंद्रपूरचे किमान तापमानही सातत्याने वाढत आहे. ३०, ३०.२, ३२ अंश सेल्सीयस अशी किमान तापमानाची नोंद होत आहे. रविवारीही ३१.२ अंश सेल्सीयस किमान तापमान नोंदविण्यात आले. या तापमानामुळे चंद्रपुरात रात्री १२ वाजेपर्यंतही वातावरणात गरम हवा राहत आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरण थंड होत नाही. त्यामुळे या किमान तापमानाचाही चंद्रपूरकरांनी धसका घेतला आहे.