शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

चंद्रपूर @ ४६.४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:26 IST

चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्हाच सध्या सूर्याच्या प्रकोपामुळे होरपळून निघत आहे. सूर्याने चंद्रपुरात रविवारी जणू उग्ररुपच धारण केले की काय, असे वाटत होते. तापनामाने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे.

ठळक मुद्देतापमानाने गाठला उच्चांकआतापर्यंतचे सर्वाधिक तापमान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्हाच सध्या सूर्याच्या प्रकोपामुळे होरपळून निघत आहे. सूर्याने चंद्रपुरात रविवारी जणू उग्ररुपच धारण केले की काय, असे वाटत होते. तापनामाने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. रविवारी चंद्रपुरातील तापमान ४६.४ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले. तप्त उन्हामुळे चंद्रपुरातील रस्ते आज दिवसभर ओस पडल्याचे दिसून आले.मागील पंधरवाड्यातच चंद्रपुरात सुर्याचा पारा ४५ अंशापर्यंत गेला होता. यापूर्वीच ४५.३, ४५.४, ४५.९ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून याचा जनजीवनावरही परिणाम पडत आहे. याशिवाय पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न तिव्रतेने उभा ठाकला आहे. ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. सर्वाहून अधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी महिना साधारण गेला. आणि मार्च महिन्यातही फारसे तापमान नव्हते. होळी झाल्यानंतर तापमानात किंचित वाढ झाली. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान घटले होते. सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण राहत असल्याने वातावरणात काही दिवस गारवा होता. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यापासून ऊन्ह तापू लागले. मागील पंधरवाड्यापासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. सातत्याने पारा ४५ अंशापार जात आहे. एप्रिल महिन्यात सुर्याने चंद्रपूरकरांची चांगलीच लाहीलाही केली. सूर्याचा हा प्रकोप असह्य होत आहे. सुर्याने अक्षरश: आग ओकणे सुरू केले आहे. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.रविवारी तर तापमानाने मर्यादाच ओलांडल्याचे दिसून आले. ४६.४ अंश सेल्सीयस तापमानाची चंद्रपुरात नोंद करण्यात आली. तर ब्रह्मपुरीत ४६ अंश सेल्सीयस तापमान नोंदविण्यात आले. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते रविवारी दुपारी ओस पडल्याचे दिसून आले. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. एकूणच नागरिकांनी उन्हाचा चांगलाच धसका घेतला आहे.मागील तीन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. पारा सातत्याने वाढत आहे. येणाऱ्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत. या वाढत्या तापमानामुळे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांनाही धोका निर्माण झाला आहे. ४७ ते ४९ अंश सेल्सीयस तापमानात पक्ष्यांना पाणी मिळाले नाही तर त्यांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.वीज केंद्र, सिमेंट रस्त्यांमुळे तापमानात वाढचंद्रपुरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. चंद्रपूरला लागूनच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या ठिकाणी सातत्याने कोळसा जाळला जातो. त्यामुळे चंद्रपूरचे किमान तापमान वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय शहरात सिमेंटचे रस्तेही याला कारणीभूत आहेत. चंद्रपूर शहराबाहेर किमान तापमान कमी असते. त्यामुळे रात्री शहराबाहेर गारवा अनुभवास येतो. रविवारी चंद्रपूरचे किमान तापमान ३१.२ तर ब्रह्मपुरीचे २७.७ अंश सेल्सीयस होते.मे महिन्याची अनेकांना धास्तीएप्रिल महिन्यातच सुर्याने आग ओकणे सुरू केले आहे. तप्त सुर्यकिरणे असह्य होत आहेत. चंद्रपूरकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. एप्रिल महिन्यातच हे हाल आहेत तर पुढे मे महिन्यात कसे होईल, याचा धसका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आतापासून घेतला आहे. मे महिन्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा सामना कसा करावा, या चिंतेत चंद्रपूरकरांची झोप उडाली आहे.किमान तापमानही फोडतोय घामचंद्रपूरचे तापमान राज्यात सर्वाधिक असते, याचा अनुभव चंद्रपूरकरांनी अनेकवेळा घेतला आहे. हे कमाल तापमानाबाबत असते. मात्र मागील काही दिवसांपासून चंद्रपूरचे किमान तापमानही सातत्याने वाढत आहे. ३०, ३०.२, ३२ अंश सेल्सीयस अशी किमान तापमानाची नोंद होत आहे. रविवारीही ३१.२ अंश सेल्सीयस किमान तापमान नोंदविण्यात आले. या तापमानामुळे चंद्रपुरात रात्री १२ वाजेपर्यंतही वातावरणात गरम हवा राहत आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरण थंड होत नाही. त्यामुळे या किमान तापमानाचाही चंद्रपूरकरांनी धसका घेतला आहे.