शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात तूर खरेदी बंदच

By admin | Updated: May 17, 2017 00:34 IST

जिल्ह्यात यावर्षी तूर खरेदीचे तीनतेरा वाजले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले.

आतापर्यंत ३२ हजार क्विंटल खरेदी : वरोऱ्यात नाफेडची खरेदी प्रारंभलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी तूर खरेदीचे तीनतेरा वाजले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु त्याचा परिणाम चंद्रपूरच्या खरेदी केंद्रावर झालेला नाही. विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरनेशनने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्याप तूर खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे बाजार समितीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तूर खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याच वेळी वरोरा येथे नाफेडने पुन्हा मंगळवारपासून तूर खरेदी सुरू केली आहे.जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत २५ हजार ५०० क्विंटल तूर खेरदी करण्यात आली होती. त्यानंतर गोंधळ उडाल्यावर २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा पुन्हा ६ हजार ५०० किंटल तूर खरेदी करण्यात आली. एकूण ३२ हजार २४४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यामध्ये चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खुल्या खरेदीमध्ये सर्वाधिक ११ हजार ९३७ क्विंटल तूर खरेदी केली. चंद्रपूर बाजार समितीमध्ये भारतीय धान्य महामंडळासाठी विदर्भ को-आॅपरेटिव्ह फेडरेशनने १० हजार १०७ क्विंटल आणि वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडने १० हजार २०० क्विंटल तूर खरेदी केंद्र केली आहे. नाफेडने तुरी खरेदीसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. शासनाच्या आदेशानंतरच पुढे तूर खरेदी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यापूर्वी नाफेडने शेतकऱ्यांकडून तूर खेरदी बंद केली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात अचलपूर बाजार समिती व चांदूरबाजार बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. बाजार समितीने ७ एप्रिल रोजी तूर खेरदी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर तुरीचे २०० पोती टाकली होती. यावर्षी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर झाले आहे. केंद्र सरकारने आधीच तूर आयात केली. तेव्हा शासनाने दोन वेळा तूर खरेदी बंद केली. विरोधी पक्षांनी तूर खरेदी बंदीविरोधात रान पेटविल्यावर शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. वरोऱ्यात पहिल्याच दिवशी ५०० क्ंिवटल वरोरा बाजार समितीमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे यापूर्वी १० हजार २०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर नाफेडने पुन्हा मंगळवारपासून हे खेरदी कें द्र सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी ५०० क्विंटल तूर खेरदी करण्यात आली. नाफेड एफएक्यू या दर्जाची तूर खेरदी करीत आहे.जिल्हाधिकारी-पालकमंत्र्यांना पत्रचंद्रपूर बाजार समितीमध्ये भारतीय धान्य महामंडळाने खरेदी केंद्र सुरू केले होते. ते गेल्या महिन्यापासून बंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही चंद्रपूर बाजार समितीत खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. चंद्रपूरच्या खरेदी केंद्रावर गडचिरोली, राजुरा, कोरपना या भागातूल तूर विक्रीसाठी येत असते. त्यामुळे चंद्रपूर बाजार समितीत तूर खेरदी केंद्र सुरू करण्याची मागणी करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना पत्र देण्यात आले आहे. बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे व उपसभापती रंजित डवरे यांनी खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.