शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

चंदईनाला प्रकल्पग्रस्त झाले निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:05 IST

‘आधार कुणाचा नाही’ हे मराठी गाणे म्हणण्याची वेळ सध्या चंदईनाला प्रकल्पग्रस्तांवर आली आहे. चंदईनाला प्रकल्पग्रस्त झाले निराधार असेच सध्या या परिसरात ऐकायला मिळत आहे.

ठळक मुद्देशासनाकडून थट्टा : साखळी उपोषणाचा शंभरावा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : ‘आधार कुणाचा नाही’ हे मराठी गाणे म्हणण्याची वेळ सध्या चंदईनाला प्रकल्पग्रस्तांवर आली आहे. चंदईनाला प्रकल्पग्रस्त झाले निराधार असेच सध्या या परिसरात ऐकायला मिळत आहे. गेल्या शंभर दिवसांपासून चंदईनाला येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी प्रकल्पाला कुलूप ठोकून प्रकल्पाच्या पाळीवरच कुटुंबासह साखळी उपोषण करीत आहेत. मात्र शासनाने अद्यापही प्रकल्पग्रस्तांची दखल घेतली नसल्याने रोष पसरला आहे.सन १९७६-७७ मध्ये निमढेला वासीयांची शेतजमीन व घरे सरकारने संपादित केले. मात्र त्यांना हक्काच्या घरापासून व शेतजमिनीपासून तसेच नोकरीपासून वंचित ठेवले. त्यामुळे प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून गेल्या ४० वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी प्रकल्पग्रस्त लढत आहेत. पण त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य व मदत मिळत नसल्याने ते हलाखीचे जीवन जगत आहे.‘तुम्हाला जिथे शेतजमीन देवू, तिथे तुम्हाला जावे लागेल, असे सांगून त्यांना तात्पुरते म्हणून जलसंपदाच्या जागेवर राहण्यास जागा दिली. तसेच त्यांच्या शेतजमिनीची व घराची शिल्लक असलेली रक्कम त्यांना दिली नाही व एक व्यक्ती शासकीय नोकरीवर घेवू असे सांगून अजूनपर्यंत त्यांना नोकरीवर घेतले नाही. या सर्व मागण्या घेवून निमढेलाग्रामवासी १० आॅगस्टपासून कुटुंबासह साखळी उपोषणाला बसले. आज उपोषणाचा १०० वा दिवस आहे. मात्र यावर प्रशासनाने कुठलाच तोडगा काढलेला नाही.प्रकल्पग्रस्तांचे रेकॉर्डच गहाळउपोषण काळात अनेकदा जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पाधिकारी यांना या प्रकरणाबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाने स्वत:वरील जबाबदारी झटकून तुम्ही प्रकल्पग्रस्त असल्याचा व तुमच्या जमिनी प्रकल्पात गेल्याचा पुरावा आणण्यास सांगितले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी जिल्ह्यातील चिमूर, मूल, गोंडपिपरी, वरोरा, चंद्रपूर हे उपविभागीय कार्यालय पालते घालूनही ते प्रकल्पग्रस्त असल्याचा व त्यांच्या जमिनीचा किंवा अवॉर्ड कॉपीबद्दलचे दस्तऐवज त्यांना सापडले नाही. यामुळे प्रकल्पग्रस्तांचा रेकॉर्डच गहाळ झाला की काय, अशी शंका प्रकल्पग्रस्त वर्तवित आहेत.आंदोलन अधिक तीव्र करणारगेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवर ‘होय मी सरकारचा लाभार्थी’ अशी जाहिरात पाहावयास व ऐकायला मिळत आहे. मात्र गेल्या चाळीस वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाºया चंदईनाला प्रकल्पग्रस्तांना याबाबत विचारले असता सरकार ही जाहिरात करून आमची थट्टाच करत असल्याचा आरोप केला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार असून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.