शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

नवरगावमध्ये विद्यार्थ्यांनी केले चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट्यावर जमा होतात. मात्र बस कधीच वेळेवर येत नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागते.

ठळक मुद्देबस उशिरा आल्याने विद्यार्थी संतापले : सिंदेवाही-नवरगाव चिमूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे पेंढरी, मोटेगाव, केवाडा, महादवाडी येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. दुपारच्या शाळेतील सुटी ५.३० वाजता होते. मात्र चिमूर आगाराच्या बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना रात्री सात वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते. या त्रासाला कंटाळून सोमवारी रत्नापूर फाट्यावर विद्यार्थी व शिक्षकांनी चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बस पाठवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट्यावर जमा होतात. मात्र बस कधीच वेळेवर येत नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागते. सिंदेवाही-चिमूर ही बस सायंकाळी ७ नंतर तर कधी उशिरा येते. या नेहमीच्या त्रासाला कटाळून विद्यार्थी आणि शिक्षकांनी सायंकाळी चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर सातच्या सुमारास सिंदेवाही-चिमूर बस आली आमि विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले. या मार्गाने येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची गावे रस्त्यावर नाहीत. केवाडा, वडशी, महादवाडी येथील विद्यार्थी पेंढरी या गावापर्यंत सायकलने येतात. तिथे सायकल ठेऊन ते बसने येतात. घटनेची दखल घेत संस्थाप्रमुख जयंत बोरकर, मुख्याध्यापक गोकूलदास वाडगुरे आदींनी चिमूर आगार प्रमुखांना निवेदन देऊन बस वेळेवर सोडण्याची मागणी केली.चिमूर आगारात आजच्या घडीला चालक-वाहक संख्या कमी आहे. त्यामुळे अनेकवेळा वाहकांची डबल ड्युटी लावली जाते. चिमूर - नवरगाव - सिंदेवाही मार्गावर दिवसभरात ४२ फेºया आहे. सोमवारी तांत्रिक अडचणीमुळे चार वाजता जाणारी फेरी उशिरा गेल्याने अडचण निर्माण झाली. यापुढे बसेस वेळेवर सोडण्यात येईल.- आर.एस. बोधे,आगार व्यवस्थापक, चिमूरनिवेदन देऊनही उपयोग नाहीचिमूर आगारामध्ये कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहे. उपलब्ध कर्मचाºयांच्या भरोवश्यावर येथे कारभार हाकला जात आहे. त्याचा परिणाम बस फेºयांवर होत आहे. परिणामी प्रवाशांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बस उशिरा येत असल्यासंदर्भात अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी