शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

नवरगावमध्ये विद्यार्थ्यांनी केले चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट्यावर जमा होतात. मात्र बस कधीच वेळेवर येत नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागते.

ठळक मुद्देबस उशिरा आल्याने विद्यार्थी संतापले : सिंदेवाही-नवरगाव चिमूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे पेंढरी, मोटेगाव, केवाडा, महादवाडी येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. दुपारच्या शाळेतील सुटी ५.३० वाजता होते. मात्र चिमूर आगाराच्या बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना रात्री सात वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते. या त्रासाला कंटाळून सोमवारी रत्नापूर फाट्यावर विद्यार्थी व शिक्षकांनी चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बस पाठवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट्यावर जमा होतात. मात्र बस कधीच वेळेवर येत नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागते. सिंदेवाही-चिमूर ही बस सायंकाळी ७ नंतर तर कधी उशिरा येते. या नेहमीच्या त्रासाला कटाळून विद्यार्थी आणि शिक्षकांनी सायंकाळी चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर सातच्या सुमारास सिंदेवाही-चिमूर बस आली आमि विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले. या मार्गाने येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची गावे रस्त्यावर नाहीत. केवाडा, वडशी, महादवाडी येथील विद्यार्थी पेंढरी या गावापर्यंत सायकलने येतात. तिथे सायकल ठेऊन ते बसने येतात. घटनेची दखल घेत संस्थाप्रमुख जयंत बोरकर, मुख्याध्यापक गोकूलदास वाडगुरे आदींनी चिमूर आगार प्रमुखांना निवेदन देऊन बस वेळेवर सोडण्याची मागणी केली.चिमूर आगारात आजच्या घडीला चालक-वाहक संख्या कमी आहे. त्यामुळे अनेकवेळा वाहकांची डबल ड्युटी लावली जाते. चिमूर - नवरगाव - सिंदेवाही मार्गावर दिवसभरात ४२ फेºया आहे. सोमवारी तांत्रिक अडचणीमुळे चार वाजता जाणारी फेरी उशिरा गेल्याने अडचण निर्माण झाली. यापुढे बसेस वेळेवर सोडण्यात येईल.- आर.एस. बोधे,आगार व्यवस्थापक, चिमूरनिवेदन देऊनही उपयोग नाहीचिमूर आगारामध्ये कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहे. उपलब्ध कर्मचाºयांच्या भरोवश्यावर येथे कारभार हाकला जात आहे. त्याचा परिणाम बस फेºयांवर होत आहे. परिणामी प्रवाशांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बस उशिरा येत असल्यासंदर्भात अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी