शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

नवरगावमध्ये विद्यार्थ्यांनी केले चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट्यावर जमा होतात. मात्र बस कधीच वेळेवर येत नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागते.

ठळक मुद्देबस उशिरा आल्याने विद्यार्थी संतापले : सिंदेवाही-नवरगाव चिमूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे पेंढरी, मोटेगाव, केवाडा, महादवाडी येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. दुपारच्या शाळेतील सुटी ५.३० वाजता होते. मात्र चिमूर आगाराच्या बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना रात्री सात वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते. या त्रासाला कंटाळून सोमवारी रत्नापूर फाट्यावर विद्यार्थी व शिक्षकांनी चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बस पाठवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट्यावर जमा होतात. मात्र बस कधीच वेळेवर येत नसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसावे लागते. सिंदेवाही-चिमूर ही बस सायंकाळी ७ नंतर तर कधी उशिरा येते. या नेहमीच्या त्रासाला कटाळून विद्यार्थी आणि शिक्षकांनी सायंकाळी चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर सातच्या सुमारास सिंदेवाही-चिमूर बस आली आमि विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले. या मार्गाने येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची गावे रस्त्यावर नाहीत. केवाडा, वडशी, महादवाडी येथील विद्यार्थी पेंढरी या गावापर्यंत सायकलने येतात. तिथे सायकल ठेऊन ते बसने येतात. घटनेची दखल घेत संस्थाप्रमुख जयंत बोरकर, मुख्याध्यापक गोकूलदास वाडगुरे आदींनी चिमूर आगार प्रमुखांना निवेदन देऊन बस वेळेवर सोडण्याची मागणी केली.चिमूर आगारात आजच्या घडीला चालक-वाहक संख्या कमी आहे. त्यामुळे अनेकवेळा वाहकांची डबल ड्युटी लावली जाते. चिमूर - नवरगाव - सिंदेवाही मार्गावर दिवसभरात ४२ फेºया आहे. सोमवारी तांत्रिक अडचणीमुळे चार वाजता जाणारी फेरी उशिरा गेल्याने अडचण निर्माण झाली. यापुढे बसेस वेळेवर सोडण्यात येईल.- आर.एस. बोधे,आगार व्यवस्थापक, चिमूरनिवेदन देऊनही उपयोग नाहीचिमूर आगारामध्ये कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहे. उपलब्ध कर्मचाºयांच्या भरोवश्यावर येथे कारभार हाकला जात आहे. त्याचा परिणाम बस फेºयांवर होत आहे. परिणामी प्रवाशांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बस उशिरा येत असल्यासंदर्भात अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी