शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

केंद्रप्रमुखांना मिळतात केवळ २०० रुपये भत्ता

By admin | Updated: December 18, 2014 00:52 IST

जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांना प्रवासभत्त्यापोटी केवळ दोनशे रुपये देण्यात येते. गुणवत्ताविकासासोबतच महत्त्वाची कामे करणाऱ्या या केंद्रप्रमुखांची शासन थट्टा करीत असून ..

चंद्रपूर : जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांना प्रवासभत्त्यापोटी केवळ दोनशे रुपये देण्यात येते. गुणवत्ताविकासासोबतच महत्त्वाची कामे करणाऱ्या या केंद्रप्रमुखांची शासन थट्टा करीत असून या भत्त्यामध्ये वाढ करून द्यावी, अशी मागणी केंद्रप्रमुखांनी केली आहे. शासनाने केंद्रप्रमुखांच्या प्रवासभत्त्यात लावलेली कात्री आता अडचणीची ठरत आहे.जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने १९९५ रोजी केंद्रप्रमुख पदाची निर्मिती केली. शाळाभेटी, वर्गनिरीक्षण, मार्गदर्शन तासिका, गुणवत्ता, विकासाचे उपक्रम राबविणे, शाळांचे रेकार्ड, नियंत्रण आणि शिक्षकांना प्रेरित करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांची १३० पदे मंजूर आहे. त्यापैकी ११० केंद्रप्रमुख पंधरा तालुक्यात कार्यरत आहे. त्यांच्याकडे सोपविलेली जबाबजारी बघता त्यांना शाळाभेटी प्रवास भत्ता लागू करण्यात आला. १९९५ रोजी केंद्रप्रमुखांना २०० रुपये प्रवासभत्ता दिला जात होता. काही जिल्ह्यात हा मिळतो, तर काही जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांना याची प्रतीक्षा करावी लागत आहे.केंद्रप्रमुखांकडे अकरा किंवा त्यापेक्षा जास्त शाळांचा समावेश आहे. किमान दोन शाळांना त्यांना आठवड्यात भेटी द्यावा लागतात. महिन्याचा विचार केल्यास २० दिवस त्यांना प्रवास करावा लागतो. मात्र त्या मोबदल्यात केवळ दोनशे रुपये मागील कित्येक वर्षांपासून मिळत आहे. राज्यातील ग्रामसेवक, कृषीसहाय्यकांना नियमितपणे प्रवासभत्ता मिळत आहे. पंधरा दिवसांचा प्रवास नसतानाही तो दिल्या जात आहे. मात्र केंद्र प्रमुखांनाच केवळ दोनशे रुपये प्रवास भत्ता दिला जात आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार तो एक हजार ६५० रुपये देण्यात यावा, अशी मागणी केंद्रप्रमुख संघाची आहे. यासाठी केंद्रप्रमुखांचा लढा सुरु आहे. जिवती, गोंडपिपरी, चंद्रपूर, भद्रावती, पोंभूर्णा, राजुरा आदी तालुक्यात अतिदूर्गम भागात जाऊन केंद्र प्रमुख आपली सेवा देत आहे. एवढेच नाही तर शासकीय कार्यक्रमामध्येही त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात येतात. शाळा ते पंचायत समिती असा प्रवास असलेल्या केंद्रप्रमुखांना अनेकवेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून नोटीसही बजावण्यात येतात. अशावेळी त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. एकतर प्रवास भत्ता योग्य नसल्याने आर्थिक टंचाई त्यातच केंद्रप्रमुखांचे वेतनही ठरलेल्या तारखेवर होत नसल्याने ते अडचणीत आले आहे. प्रशासनाने केंद्रप्रमुखांच्या समस्या सोडवून वेतनाची जी तारीख ठरली आहे. त्याच तारखेला वेतन द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)