शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

ताडोबातील बंदिस्त गजराजवर सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चवताळलेल्या गजराजने १६ नोव्हेंबरला माहुत जानिक मसराम (४७) याला सोेंडेने आपटून त्यानंतर पायाने डोके ठेचून ठार केले होते. या घटनेमुळे संपूर्ण ताडोबा प्रशासन हादरले. चवताळलेला गजराजने आपला मोर्चा मोहर्लीकडे नेल्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्याला ट्रॅन्क्यूलाईझ करणे किंवा शुट करणे हे दोनच पर्याय ताडोबा प्रशासनाकडे होते.

ठळक मुद्दे२४ तास डॉक्टरांची नजर : धोका टाळण्यासाठी सौर ऊर्जेचे कुंपण

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक महिन्यापूर्वी चवताळलेल्या हत्तीला बेशुद्ध केल्यानंतर त्याला साखळदंड घालून जेरबंद करण्यात आले होते. मागील महिनाभरापासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर पशुवैद्यकीय अधिकारी २४ तास नजर ठेवून आहे. दरम्यान, धोका टाळण्यासाठी त्याला सौर उर्जेच्या कुंपणामध्ये ठेवण्यात आले आहे. अद्यापही त्याच्या हार्मोन्सची पातळी कमी झाली नसल्याने त्याची दहशत कायम आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चवताळलेल्या गजराजने १६ नोव्हेंबरला माहुत जानिक मसराम (४७) याला सोेंडेने आपटून त्यानंतर पायाने डोके ठेचून ठार केले होते. या घटनेमुळे संपूर्ण ताडोबा प्रशासन हादरले. चवताळलेला गजराजने आपला मोर्चा मोहर्लीकडे नेल्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्याला ट्रॅन्क्यूलाईझ करणे किंवा शुट करणे हे दोनच पर्याय ताडोबा प्रशासनाकडे होते. मात्र ताडोबा बफर क्षेत्राचे उपवनसंरक्षक गुरुप्रदास यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यासोबत चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत गजराजला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर खोब्रागडे यांनी शर्थिचे प्रयत्न करून त्याला यशस्वीरित्या बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. यामुळे मोठी दुर्घटना टळली असून मागील एक महिन्यापासून त्याला साखळदंडामध्ये डॉक्टरांच्या देखरेखाली ठेवण्यात आले आहे. असे असले तरी अद्यापही त्याचे हार्मोन्स कमी झालेले नाही.दररोज १५० किलो गवत आणि पाण्याचा माराचवताळलेल्या गजराजला साखळदंडामध्ये बंद करून ठेवल्यानंतर त्याला दररोज १५० किलो गवत तसेच औषधोपचार केला जात आहे. एवढेच नाही, तर त्याच्यावर सतत पाण्याचा मारा करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.२५ वर्षांपूर्वी घडली होती अशीच घटनाताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये २५ वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती. त्यावेळी हत्तीला हाताळण्यासाठी असलेल्या अपुऱ्या सुविधा तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असल्यामुळे चवताळलेल्या हत्तीला ठार करण्यात आले होते. मात्र यावेळी परिस्थितीमध्ये थोड्याफार बदल झाला असून अनुभवी पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या प्रयत्नामुळे यावेळी गणराजचा प्राण वाचला.या हत्तीला कंट्रोल करणे अशक्यप्राय होते. मात्र मोठ्या प्रयत्नानंतर त्याला बेशुद्ध करण्यात यश आले. त्याच्या प्रत्येक हालचालीवर पूर्णवेळ लक्ष ठेवण्यात येत असून औषधोपचार सुरु आहे.- डॉ. रविकांत खोब्रागडेपशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरहत्तीला साखळदंडामध्ये ठेवण्यात आले असून त्याची पूर्णवेळ देखरेख करणे सुरु आहे. धोका टाळण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही तसेच संपूर्ण परिसरामध्ये सौरउर्जेचे कुंपन करण्यात आले आहे.- एन. आर. प्रवीण, क्षेत्र संचालक ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प