शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

सीसीटीव्ही यंत्रणा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणार

By admin | Updated: September 28, 2015 01:13 IST

देशाच्या व राज्याच्या विकासात प्रगत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सज्जन शक्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत,

देशाच्या व राज्याच्या विकासात प्रगत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सज्जन शक्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत,बल्लारपूर : देशाच्या व राज्याच्या विकासात प्रगत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सज्जन शक्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तर दुर्जन शक्तीसाठी कर्दनकाळ ठरणारी बाब आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा अस्तित्वात आला असून सीसीटीव्ही यंत्रणा गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणारी प्रभावी यंत्रणा म्हणून कर्तव्य बजावणार आहे, असे मत राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.पोलीस ठाणे बल्लारपूरच्या वतीने शहरात २० महत्त्वाच्या ठिकाणी ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतून ४० लाख रुपये खर्च करून सर्व्हेलन्स यंत्रणेच्या उद्घाटनप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रल्हाद गिरी, पोलीस उपअधीक्षक (गृह) जसचंद काठे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, तहसीलदार डी.एस. भोयर, भाजपाचे जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक नरूमणी तांडी यांची उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर पोलीस ठाणे अद्यावत करण्यात येणार आहे. ४० हजार फुटाच्या बांधकामासाठी १७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली असून नवीन स्वरूपातील पोलीस ठाणे आकारास येणार आहे. अन्य पोलीस ठाण्याच्या तुलनेत येथील ठाणे जिल्ह्यासाठी आदर्श ठरणारे आहे. बल्लारपूर ते बामणी (दुधोली) दरम्यान विद्युत व्यवस्थेसाठी ४ कोटी रुपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येथील बसस्थानकाचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही ते म्हणाले. सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा सुलभ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाला सुविधा पुरवणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बल्लारपूरचे ग्रामीण रुग्णालय, विसापूर व दुर्गापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबत जोडण्याचा संकल्प मुनगंटीवार यांनी जाहीर केला. आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहचविणार, असे आश्वासनही त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)