शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

शाळांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे

By admin | Updated: November 20, 2014 22:49 IST

बुधवारी ख्रिस्तानंद विद्यालयातून अपह्त झालेल्या शिवानी नामक चार वर्षीय बालिकेला पोलिसांनी सुखरुप परत आणले. असे असले तरी या घटनेने पालकवर्गांमध्ये भीती पसरली आहे.

बालिका अपहरण प्रकरण : भयभीत पालकांची मागणीब्रह्मपुरी : बुधवारी ख्रिस्तानंद विद्यालयातून अपह्त झालेल्या शिवानी नामक चार वर्षीय बालिकेला पोलिसांनी सुखरुप परत आणले. असे असले तरी या घटनेने पालकवर्गांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे शाळांसमोर व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमरे बसवावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. निसर्ग उपचार केंद्राद्वारे बनविलेल्या औषधांचा व्यवसाय करणारे मोहन गजबे यांच्या शिवानी नामक बालिकेचे बुधवारी ख्रिस्तांनद विद्यालयातून अपहरण करण्यात आले. यात पोलिसांनी मोहन गजबे यांचेच मित्र कबिंद्र लजपतसिंग ठाकूर व अमित दिलीप थापा यांना ताब्यात घेऊन शिवानीची सुखरुप सुटका केली. मात्र भरदिवसा घडलेल्या या अपहरण प्रकरणाचा पालकांनी मोठा धसका घेतला. बुधवारी दुपारपासून ख्रिस्तानंद विद्यालयासमोर पालक, विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. येथील चौकाचौकात, रस्त्यावर याच प्रकरणाची चर्चा केली जात होती. आरोपी पोलिसांच्या जाळ्यात असले तरी पालकवर्ग मात्र या घटनेमुळे भयभित झाले आहेत. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने शाळेत व शाळेसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी भावना लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)आरोपींना पकडण्यात पत्रकारांचेही सहकार्यअपहरणानंतर आरोपी कबींद्र ठाकूर शाळेसमोर आला होता. याची माहिती मुलीच्या आईने लोकमतचे तालुका प्रतिनिधी रवी रणदिवे व पत्रकार अरविंद चुनारकर यांना दिली. त्यानंतर या पत्रकारांनी कबींद्रला आपल्या मोटरसायकलवर बसवून पोलीस ठाण्यात नेले. तिथे संशयावरून पोलिसी खाक्या दाखविताच कबींद्रने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान याबाबत या पत्रकारांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावतीनेही शुक्रवारी रवी रणदिवे व अरविंद चुनारकर यांचा सत्कार केला जाणार आहे.संयुक्त व्यवसायातून रचला अपहरणाचा कटमुलीच्या वडीलाचे निसर्गोचार केंद्र असून आरोपी कबिंद्र याच्याशी २००२ मध्ये दिल्ली येथे ओळख झाली होती. दिल्लीच्या सूर्या फाऊंडेशन संस्थेमार्फत दोघांनाही चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काम मिळाले. मुलीच्या वडिलांचे निसर्गोपचार के ंद्र पाहून कबिंद्र यांने त्यांच्याशी जवळीकता साधली. त्यांनी संयुक्त व्यवसाय सुरु केला. निसर्गोचार केंद्रासाठी दोघांनीही प्रत्येकी ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. यासाठी कबिंद्रने बिगर सहकारी संस्थेतून ५० हजार रुपयाचे कर्ज घेतले. मात्र, निसर्गपचार केंद्रात उपचार करण्याऐवजी कबिंद्र हा कुंटुबातच वेळ घालवायचा. त्यामुळे दोघात थोडा दुरावा निर्माण झाला. दीड महिना एकत्र काम केल्यानंतर कबिंद्र याने मूल येथे स्वत:चा निसर्गोपचार केंद्र सुरु केले. त्यामुळे दोघांत आणखी दुरावा वाढला. मुलीच्या वडीलांसोबत केलेल्या गुुतंवणूकीचे पैसे त्याने फोन करुन मागणे सुरु केले. अनेकदा मुलीच्या आईलाही फोन करुन पैशाची मागणी करायचा. पैशासाठी त्याने अनेक वेळा धमकीही दिली होती. यातूनच त्याने मुलीचे अपहरण करुन वडीलांकडून पैसे मागण्याचा कट रचला.