शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शाळांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे

By admin | Updated: November 20, 2014 22:49 IST

बुधवारी ख्रिस्तानंद विद्यालयातून अपह्त झालेल्या शिवानी नामक चार वर्षीय बालिकेला पोलिसांनी सुखरुप परत आणले. असे असले तरी या घटनेने पालकवर्गांमध्ये भीती पसरली आहे.

बालिका अपहरण प्रकरण : भयभीत पालकांची मागणीब्रह्मपुरी : बुधवारी ख्रिस्तानंद विद्यालयातून अपह्त झालेल्या शिवानी नामक चार वर्षीय बालिकेला पोलिसांनी सुखरुप परत आणले. असे असले तरी या घटनेने पालकवर्गांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे शाळांसमोर व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमरे बसवावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. निसर्ग उपचार केंद्राद्वारे बनविलेल्या औषधांचा व्यवसाय करणारे मोहन गजबे यांच्या शिवानी नामक बालिकेचे बुधवारी ख्रिस्तांनद विद्यालयातून अपहरण करण्यात आले. यात पोलिसांनी मोहन गजबे यांचेच मित्र कबिंद्र लजपतसिंग ठाकूर व अमित दिलीप थापा यांना ताब्यात घेऊन शिवानीची सुखरुप सुटका केली. मात्र भरदिवसा घडलेल्या या अपहरण प्रकरणाचा पालकांनी मोठा धसका घेतला. बुधवारी दुपारपासून ख्रिस्तानंद विद्यालयासमोर पालक, विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. येथील चौकाचौकात, रस्त्यावर याच प्रकरणाची चर्चा केली जात होती. आरोपी पोलिसांच्या जाळ्यात असले तरी पालकवर्ग मात्र या घटनेमुळे भयभित झाले आहेत. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने शाळेत व शाळेसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी भावना लोकमतशी बोलताना व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)आरोपींना पकडण्यात पत्रकारांचेही सहकार्यअपहरणानंतर आरोपी कबींद्र ठाकूर शाळेसमोर आला होता. याची माहिती मुलीच्या आईने लोकमतचे तालुका प्रतिनिधी रवी रणदिवे व पत्रकार अरविंद चुनारकर यांना दिली. त्यानंतर या पत्रकारांनी कबींद्रला आपल्या मोटरसायकलवर बसवून पोलीस ठाण्यात नेले. तिथे संशयावरून पोलिसी खाक्या दाखविताच कबींद्रने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान याबाबत या पत्रकारांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावतीनेही शुक्रवारी रवी रणदिवे व अरविंद चुनारकर यांचा सत्कार केला जाणार आहे.संयुक्त व्यवसायातून रचला अपहरणाचा कटमुलीच्या वडीलाचे निसर्गोचार केंद्र असून आरोपी कबिंद्र याच्याशी २००२ मध्ये दिल्ली येथे ओळख झाली होती. दिल्लीच्या सूर्या फाऊंडेशन संस्थेमार्फत दोघांनाही चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात काम मिळाले. मुलीच्या वडिलांचे निसर्गोपचार के ंद्र पाहून कबिंद्र यांने त्यांच्याशी जवळीकता साधली. त्यांनी संयुक्त व्यवसाय सुरु केला. निसर्गोचार केंद्रासाठी दोघांनीही प्रत्येकी ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. यासाठी कबिंद्रने बिगर सहकारी संस्थेतून ५० हजार रुपयाचे कर्ज घेतले. मात्र, निसर्गपचार केंद्रात उपचार करण्याऐवजी कबिंद्र हा कुंटुबातच वेळ घालवायचा. त्यामुळे दोघात थोडा दुरावा निर्माण झाला. दीड महिना एकत्र काम केल्यानंतर कबिंद्र याने मूल येथे स्वत:चा निसर्गोपचार केंद्र सुरु केले. त्यामुळे दोघांत आणखी दुरावा वाढला. मुलीच्या वडीलांसोबत केलेल्या गुुतंवणूकीचे पैसे त्याने फोन करुन मागणे सुरु केले. अनेकदा मुलीच्या आईलाही फोन करुन पैशाची मागणी करायचा. पैशासाठी त्याने अनेक वेळा धमकीही दिली होती. यातूनच त्याने मुलीचे अपहरण करुन वडीलांकडून पैसे मागण्याचा कट रचला.