शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयतर्फे खरेदी केंद्र सुरू करणार

By admin | Updated: November 16, 2015 00:56 IST

गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादन शेतकऱ्यांना आवश्यकता असूनही त्यांच्या उत्पादनाची खरेदी करण्याची उपयुक्त व्यवस्था नसल्याने

शेतकऱ्यांना दिलासा : हंसराज अहीर यांचा पुढाकारचंद्रपूर : गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादन शेतकऱ्यांना आवश्यकता असूनही त्यांच्या उत्पादनाची खरेदी करण्याची उपयुक्त व्यवस्था नसल्याने त्यांना त्यांचे उत्पादन खासगी व्यापाऱ्यांना पडेल किंमतीत विकण्याची पाळी येत होती. याची दखल घेत केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कापूस उत्पादकांना केंद्र सरकारने घोषित केलेल्या किमान बाजारमूल्य भावाने खरेदी केंद्र उपलब्ध करून देवून त्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी केंद्र सरकारच्या उपक्रम असलेल्या भारतीय कपास निगम लिमिटेडच्या माध्यमाने आपल्या क्षेत्रात कापूस उत्पादकांना त्यांचा कापूस तातडीने विक्री करून देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असून या कापूस उत्पादकांना खरेदीची शाश्वती नसल्याने त्यांच्या उत्पादनाच्या खासगी व्यापाऱ्यांकडून अनुचित लाभ घेतल्या जात होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने असे नुकसान टाळून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या किमान बाजारमुल्य भावाचा फायदा मिळावा, याकरिता भारतीय कपास निगम लिमीच्या अध्यक्ष तथा प्रबंध निदेशकांशी प्रत्यक्ष चर्चा करून पूर्व विदर्भातील कापूस उत्पादक क्षेत्रात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने भारतीय कपास निगम लिमी.ने राजुरा, वरोरा, घाटंजी, पांढरकवडा, कापसी, नांदुरा, वरुड, पुलगाव व वडनेर येथे खरेदी सुरू केली आहे.भारतीय कपास निगमतर्फे सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची कापूस प्रमाणीकरणच्या नावाने कर्मचाऱ्यांनी लूट करू नये, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर देण्यासाठी भारतीय कपास निगमने आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य आदेश निर्गमीत करावे. कापूस खरेदीत शेतकऱ्यांची कोणत्याही कारणामुळे झालेली फसवणूक यापुढे सहन करण्यात येणार नाही याची दक्षता घेवून कापूस खरेदी शेतकऱ्यांना फायदेशीर व्हावी याकरिता केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संबंधितांना आवश्यक निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)