शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

राज्यातील सीबीएसईतही वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशाचा निर्णय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 17:51 IST

सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

ठळक मुद्देमानव संसाधन राज्यमंत्र्यांचे सुधीर मुनगंटीवार यांना आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सीबीएसई शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मागणीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्याची मागणी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे केली होती.कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व शाळांमध्ये वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असताना सीबीएसई शाळांनी अशा कोणत्याही सूचना सीबीएसई बोर्डाने दिल्या नसल्याचे सांगून यासाठी नकार दिल्याची बाब पालकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणली. आ. मुनगंटीवार यांनी त्वरीत मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल व राज्यमंत्री संजय धोत्रे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून सीबीएसई शाळांना स्पष्ट निर्देश देण्याची विनंती केली. संजय धोत्रे यांच्याशी आ. मुनगंटीवार यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असता सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती आ. मुनगंटीवार यांना दिली आहे. राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्याा पालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा