शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावर जलसंकट उद्भवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:26 IST

अतिदुर्गम जिवती तालुक्यात यंदा पहाडावर अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले व गावतलावही कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली.

ठळक मुद्देशेतीचे नुकसान : अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम जिवती तालुक्यात यंदा पहाडावर अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले व गावतलावही कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली.जिवती तालुक्यात एकूण ८३ गावे आहेत. या गावांची लोकसंख्या ७० हजार एवढी आहे. परिसरात सिंचनाच्या सोयीसुविधा नाहीत. संपूर्ण कोरडवाहू क्षेत्र असून निसर्गाच्या पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिला. पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी, अनेक तलाव व बंधारे कोरडे पडले आहेत. काही गावात सिंचनाच्या योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता येत नाही. पुरेसे उत्पन्न घेणे दूरच राहिले. दरवर्षी निसर्गाच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सुरू होणारी पाणी टंचाई यंदा जानेवारीतच सुरू झाली आहे. अनेक गावातील नदी-नाले व गाव तलाव कोरडे पडले आहेत. बहुतेक शेतकरी पाण्याअभावी पारंपरिक शेती करतात.यातून खर्चही निघत नाही. शेती व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने पहाडावरील नागरिकांना उन्हाळ्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी. रखडलेली सिचंन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई