शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पहाडावर जलसंकट उद्भवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:26 IST

अतिदुर्गम जिवती तालुक्यात यंदा पहाडावर अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले व गावतलावही कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली.

ठळक मुद्देशेतीचे नुकसान : अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम जिवती तालुक्यात यंदा पहाडावर अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले व गावतलावही कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली.जिवती तालुक्यात एकूण ८३ गावे आहेत. या गावांची लोकसंख्या ७० हजार एवढी आहे. परिसरात सिंचनाच्या सोयीसुविधा नाहीत. संपूर्ण कोरडवाहू क्षेत्र असून निसर्गाच्या पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिला. पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी, अनेक तलाव व बंधारे कोरडे पडले आहेत. काही गावात सिंचनाच्या योजना पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता येत नाही. पुरेसे उत्पन्न घेणे दूरच राहिले. दरवर्षी निसर्गाच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. एप्रिल-मे महिन्यापासून सुरू होणारी पाणी टंचाई यंदा जानेवारीतच सुरू झाली आहे. अनेक गावातील नदी-नाले व गाव तलाव कोरडे पडले आहेत. बहुतेक शेतकरी पाण्याअभावी पारंपरिक शेती करतात.यातून खर्चही निघत नाही. शेती व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने पहाडावरील नागरिकांना उन्हाळ्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी. रखडलेली सिचंन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई