शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूरपरिस्थितीत जीव मुठीत घेऊन जगतात गावकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

जेव्हा जेव्हा महापूर आले आहेत, तेव्हा तेव्हा येथील जनता खूप भयभीत झाली आहे.  पूरपरिस्थितीत येथील गावकरी जीव मुठीत घेऊन राहतात. चहुबाजूंनी गावाला पुराचा वेढा असतो.  १९९४ पासून येथील ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी घेऊन शासन प्रशासनाचा दरवाजा ठोठावत आहेत. यासाठी पुनर्वसन संघर्ष समितीची गावकऱ्यांनी स्थापना करून वेळोवेळी या समितीच्या माध्यमातून गावकरी पुनर्वसनाची मागणी रेटून धरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी :  ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा मांगली गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गावाला पुराचा फटका वारंवार बसला आहे. पूरपरिस्थितीत जीव मुठीत घेऊन गावकऱ्यांना जगावे लागत आहे. त्यामुळे गावाचे पुनर्वसन हाच उपाय आहे.जेव्हा जेव्हा महापूर आले आहेत, तेव्हा तेव्हा येथील जनता खूप भयभीत झाली आहे.  पूरपरिस्थितीत येथील गावकरी जीव मुठीत घेऊन राहतात. चहुबाजूंनी गावाला पुराचा वेढा असतो.  १९९४ पासून येथील ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी घेऊन शासन प्रशासनाचा दरवाजा ठोठावत आहेत. यासाठी पुनर्वसन संघर्ष समितीची गावकऱ्यांनी स्थापना करून वेळोवेळी या समितीच्या माध्यमातून गावकरी पुनर्वसनाची मागणी रेटून धरत आहेत. नुकताच या विषयाचे एक निवेदन राज्याचे मदत व पुनर्वसन व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना गावकऱ्यांनी दिले आहे. बऱ्याचवेळा उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना  गावाच्या पुनर्वसनाबाबत निवेदने सादर करण्यात आली आहेत. येथील जनता विशेषकरून १९९४ पासून सातत्याने शासन प्रशासनाला ही मागणी करत आली आहे. या खात्याचे मंत्री ना.वडेट्टीवार असल्याने गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी प्रभाकर सेलोकर,  पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष गोकुलदास कार, उपसरपंच भावेश दोनाडकर, देवीदास लिंगायत, नानाजी मुंडरे, आंबेवडेकर बनकर, देवाजी कामडी, खुशाल सोंडवले, संजय बिंजवेसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.                   

अनेकदा आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीसन १९९४, २००५, २००७, २०२१ या वर्षात आलेल्या पुरामुळे गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. येथे ३०० घरांची वस्ती असून १२०० - १४०० च्या आसपास लोकसंख्या आहे. गावाला पुराचा वेढा निर्माण होतो. बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.

सन १९९४ पासून अनेकदा गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी शासनाकडे वारंवार करण्यात आली आहे. फक्त गावाचे पुनर्वसन दोन-चार कि.मी. अंतरावर करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पुनर्वसन मंत्री आपले आमदार आहेत. त्यांनी जातीने लक्ष घालून मांगलीचे पुनर्वसन करावे.- गोकूळ कार, सरपंच, मांगली ता. ब्रम्हपुरी, 

 

टॅग्स :floodपूरgram panchayatग्राम पंचायत