शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

गावपातळीवर लसीकरण जनजागृती मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST

चंद्रपूर : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात काही नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज आहे. ...

चंद्रपूर : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात काही नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावर योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, नगरविकास विभागाचे अजितकुमार डोके उपस्थित होते.

ग्रामपंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधी, सरपंच, तलाठी, पोलीसपाटील, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने लसीकरणासंदर्भात जनजागृती करावी. ज्या रुग्णांना कोरोना होऊन गेला आहे व ज्या रुग्णांना मधुमेह आहे, अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार आढळून येत आहे. अशा रुग्णांची माहिती घ्यावी. तसेच कोविडमुळे दोन्ही पालक गमाविलेल्या अनाथ बालकांची माहिती तालुकानिहाय गोळा करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजनेच्या अनुषंगाने गावनिहाय करण्यात आलेल्या उपाययोजना व कार्याची माहिती गटविकास अधिकारी यांच्याकडून जाणून घेतली. तसेच आपले गाव, वार्ड, मोहल्ला कोरोनामुक्त ठेवल्यास जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. यासाठी पंधरा दिवसांतून ग्रामसेवकासोबत किमान एक बैठक घ्यावी तसेच दर पंधरवाड्याला आढावा घ्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना तसेच जिल्ह्यासाठी कोरोना लसीची उपलब्धता, वितरण, केंद्राची संख्या, नागरिकांचे झालेले लसीकरण, उर्वरित व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी करावयाची जनजागृती यावर संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.