शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

हायवाने अर्धा किमीपर्यंत कारला फरफटत नेलं, वैद्यकीय अधिकारी दाम्पत्याचा मृत्यू

By राजेश भोजेकर | Updated: March 22, 2023 21:42 IST

वरोरा-वणी मार्गावरील शेंबळ गावाजवळील भीषण अपघात

वरोरा (चंद्रपूर) : वरोरा-वणी मार्गावरील शेंबळ गावाच्या शिवारात भरधाव हायवा ट्रकने कारला समोरून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये हायवाने कारला अर्धा किमी अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमधील वैद्यकीय अधिकारी असलेले दाम्पत्य ठार झाले. हा अपघात बुधवार, दि. २२ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला. अतुल गौरकार (वय ३४) व त्यांच्या पत्नी अश्विनी गौरकार (३१, रा. दीनदयाल सोसायटी, तुकुम, चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.

अतुल गौरकार हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपजिल्हा रुग्णालय, तर अश्विनी या यवतमाळ जिल्ह्यातील वणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. वरोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हायवा ट्रक ताब्यात घेऊन चालक अभिमन्यू साकेत (२५, मूळचा मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम शेंबळ) याला अटक करण्यात आली आहे. नागरिकांकडून याबाबत हळहळ व्यक्त होत होती. प्राप्त माहितीनुसार, अतुल गौरकार व त्यांच्या पत्नी अश्विनी हे दोघेही चंद्रपूरहून कार (एमएच ३४ एएम ४२४०)ने वरोरा नजीकच्या बायपास मार्गाने वणीकडे जात होत होते.

वरोरा तालुक्यातील शेंबळ शेतशिवारात समोरून भरधाव वेगात आलेल्या हायवा ट्रक (एमएच ३४ बीझेड २९९६)ने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हायवा ट्रकने कारला अर्धा किमीपर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमध्ये असलेले गौरकार दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाले. कारमध्ये दोघेही अडकून पडले होते. घटनास्थळी धावून आलेल्या लोकांनी त्यांना मोठ्या कसरतीने बाहेर काढले. मात्र, अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला होता.

गंभीर जखमी असलेले अतुल गौरकार यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, वाटेतच भद्रावतीजवळ त्यांचीही प्राणज्योत मालवली. अतुल आणि अश्विनी यांना एक वर्षाचा शेरवीर हा मुलगा आहे. आई-वडिलांवर अचानक काळाने घाला घातल्याने हा चिमुकला पोरका झाला आहे. या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.

अश्विनी या वैद्यकीय अधिकारीअश्विनी गौरकार या वणी येथील उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी एकच दिवस सेवा दिल्याची माहिती त्यांच्या आप्तेष्टांनी दिली.

दैव बलवत्तर म्हणून शेरवीर बचावलाअपघातात ठार झालेल्या गौरकार दाम्पत्याला एक वर्षाचा शेरवीर नावाचा मुलगा आहे. तिघेही चंद्रपूरला आले होते. अतुल आणि अश्विनी यांनी चंद्रपूरला आपल्या घरी आजोबाकडे चिमुकल्याला ठेवून वणीला जाऊन येतो म्हणून गेले होते, अशी चर्चा सुरू आहे. काळ दबा धरून बसला होता. या अपघातात दोघेही ठार झाले. सुदैवाने चिमुकला शेरवीर यातून बचावला. दैव बलवत्तर म्हणून शेरवीर बचावल्याची चर्चाही समाजमाध्यमांवर आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरAccidentअपघात