शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हायवाने अर्धा किमीपर्यंत कारला फरफटत नेलं, वैद्यकीय अधिकारी दाम्पत्याचा मृत्यू

By राजेश भोजेकर | Updated: March 22, 2023 21:42 IST

वरोरा-वणी मार्गावरील शेंबळ गावाजवळील भीषण अपघात

वरोरा (चंद्रपूर) : वरोरा-वणी मार्गावरील शेंबळ गावाच्या शिवारात भरधाव हायवा ट्रकने कारला समोरून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये हायवाने कारला अर्धा किमी अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमधील वैद्यकीय अधिकारी असलेले दाम्पत्य ठार झाले. हा अपघात बुधवार, दि. २२ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला. अतुल गौरकार (वय ३४) व त्यांच्या पत्नी अश्विनी गौरकार (३१, रा. दीनदयाल सोसायटी, तुकुम, चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.

अतुल गौरकार हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपजिल्हा रुग्णालय, तर अश्विनी या यवतमाळ जिल्ह्यातील वणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. वरोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हायवा ट्रक ताब्यात घेऊन चालक अभिमन्यू साकेत (२५, मूळचा मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम शेंबळ) याला अटक करण्यात आली आहे. नागरिकांकडून याबाबत हळहळ व्यक्त होत होती. प्राप्त माहितीनुसार, अतुल गौरकार व त्यांच्या पत्नी अश्विनी हे दोघेही चंद्रपूरहून कार (एमएच ३४ एएम ४२४०)ने वरोरा नजीकच्या बायपास मार्गाने वणीकडे जात होत होते.

वरोरा तालुक्यातील शेंबळ शेतशिवारात समोरून भरधाव वेगात आलेल्या हायवा ट्रक (एमएच ३४ बीझेड २९९६)ने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हायवा ट्रकने कारला अर्धा किमीपर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमध्ये असलेले गौरकार दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाले. कारमध्ये दोघेही अडकून पडले होते. घटनास्थळी धावून आलेल्या लोकांनी त्यांना मोठ्या कसरतीने बाहेर काढले. मात्र, अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला होता.

गंभीर जखमी असलेले अतुल गौरकार यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, वाटेतच भद्रावतीजवळ त्यांचीही प्राणज्योत मालवली. अतुल आणि अश्विनी यांना एक वर्षाचा शेरवीर हा मुलगा आहे. आई-वडिलांवर अचानक काळाने घाला घातल्याने हा चिमुकला पोरका झाला आहे. या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.

अश्विनी या वैद्यकीय अधिकारीअश्विनी गौरकार या वणी येथील उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी एकच दिवस सेवा दिल्याची माहिती त्यांच्या आप्तेष्टांनी दिली.

दैव बलवत्तर म्हणून शेरवीर बचावलाअपघातात ठार झालेल्या गौरकार दाम्पत्याला एक वर्षाचा शेरवीर नावाचा मुलगा आहे. तिघेही चंद्रपूरला आले होते. अतुल आणि अश्विनी यांनी चंद्रपूरला आपल्या घरी आजोबाकडे चिमुकल्याला ठेवून वणीला जाऊन येतो म्हणून गेले होते, अशी चर्चा सुरू आहे. काळ दबा धरून बसला होता. या अपघातात दोघेही ठार झाले. सुदैवाने चिमुकला शेरवीर यातून बचावला. दैव बलवत्तर म्हणून शेरवीर बचावल्याची चर्चाही समाजमाध्यमांवर आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरAccidentअपघात