शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

चंद्रपुरात आठ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:38 IST

मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्दे मनपाचे अफलातून सर्वेक्षण : मुंबईसारखी घटना घडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून चंद्रपूर शहरातही अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून चंद्रपुरातील अशा निर्लेखित इमारतींची माहिती घेतली असता चंद्रपुरात केवळ आठच इमारती जीर्ण असल्याची माहिती मिळाली. या इमारत मालकांना केवळ नोटीस बजाविण्यापलिकडे मनपाने काहीही केलेले नाही. त्यामुळे मुंबईसारखी घटना घडल्यास अनेकांना प्राण गमवावे लागण्याची शक्यता आहे.धोकादायक व जीर्ण इमारतींबाबत दरवर्षी स्थानिक प्रशासनाकडून सर्व्हेक्षण केले जाते. याशिवाय नागरिकांच्या तक्रारीवरूनही धोकादायक इमारतींची नोंद केली जाते. मात्र चंद्रपूर महानगर पालिकेने यावर्षी धोकादायक व जीर्ण इमारतींचे सर्व्हेक्षणच केले नसल्याची माहिती आहे. नगर रचनाकार विभागात याबाबत माहिती जाणून घेतली असता, शहरात केवळ आठच इमारती धोकादायक असून त्या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.मनपाने हा आकडा सांगितला असला तरी प्रत्यक्षात शहरात स्थिती वेगळी आहे. शहरात आठपेक्षा अधिक इमारती कालबाह्य आणि धोकादायक झाल्याचे शहरात फेरफटका मारला असता दिसून येते. काही इमारतींच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत तर काही लहानसहान घरांचे छत कोसळण्याच्या स्थितीत आहेत.महानगरपालिकेच्या सर्व्हेक्षणात केवळ आठ इमारतीच धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. या इमारत मालकांना नोटीस बजावल्यानंतर घरमालकाने काय कार्यवाही केली, त्यांनी केली नसेल तर महापालिकेने काय कार्यवाही केली, अशी विचारणा केली असता, दोन वर्षांपूर्वी एक-दोन धोकादायक इमारती पाडण्यात आल्या होत्या. मात्र दोन वर्षांत अशी कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात आले.भिंत कोसळून गेला होता बळीसोमवारी सकाळी खर्रा घेण्यासाठी प्रियदर्शिनी चौकातील पानटपरीवर उभ्या असलेल्या कैलास डोंगी (२४) नामक युवकावर पानटपरीला लागून असलेली सुरक्षा भिंत कोसळली होती. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही भिंतही जीर्ण झाली होती. याशिवाय शहरात अनेक अशा भिंती जीर्ण झालेल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने या भिंती केव्हाही कोसळून अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.मनपाचे दुर्लक्षकाही इमारतींचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने ती इमारत धोकादायक असतानाही पाडता येत नसल्याचे नगर रचनाकार विभागाने सांगितले. शहरात तीन झोन कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी धोकादायक इमारतींची एकत्रित माहितीच मनपाकडे उपलब्ध नसल्याचेही यावेळी दिसून आले. स्ट्रक्चरल आॅडिट संदर्भात विचारणा केली असता, माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धोकादायक इमारतींविषयी मनपा किती दक्ष आहे, हे दिसून येते.