शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात आठ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:38 IST

मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्दे मनपाचे अफलातून सर्वेक्षण : मुंबईसारखी घटना घडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून चंद्रपूर शहरातही अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून चंद्रपुरातील अशा निर्लेखित इमारतींची माहिती घेतली असता चंद्रपुरात केवळ आठच इमारती जीर्ण असल्याची माहिती मिळाली. या इमारत मालकांना केवळ नोटीस बजाविण्यापलिकडे मनपाने काहीही केलेले नाही. त्यामुळे मुंबईसारखी घटना घडल्यास अनेकांना प्राण गमवावे लागण्याची शक्यता आहे.धोकादायक व जीर्ण इमारतींबाबत दरवर्षी स्थानिक प्रशासनाकडून सर्व्हेक्षण केले जाते. याशिवाय नागरिकांच्या तक्रारीवरूनही धोकादायक इमारतींची नोंद केली जाते. मात्र चंद्रपूर महानगर पालिकेने यावर्षी धोकादायक व जीर्ण इमारतींचे सर्व्हेक्षणच केले नसल्याची माहिती आहे. नगर रचनाकार विभागात याबाबत माहिती जाणून घेतली असता, शहरात केवळ आठच इमारती धोकादायक असून त्या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.मनपाने हा आकडा सांगितला असला तरी प्रत्यक्षात शहरात स्थिती वेगळी आहे. शहरात आठपेक्षा अधिक इमारती कालबाह्य आणि धोकादायक झाल्याचे शहरात फेरफटका मारला असता दिसून येते. काही इमारतींच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत तर काही लहानसहान घरांचे छत कोसळण्याच्या स्थितीत आहेत.महानगरपालिकेच्या सर्व्हेक्षणात केवळ आठ इमारतीच धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. या इमारत मालकांना नोटीस बजावल्यानंतर घरमालकाने काय कार्यवाही केली, त्यांनी केली नसेल तर महापालिकेने काय कार्यवाही केली, अशी विचारणा केली असता, दोन वर्षांपूर्वी एक-दोन धोकादायक इमारती पाडण्यात आल्या होत्या. मात्र दोन वर्षांत अशी कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात आले.भिंत कोसळून गेला होता बळीसोमवारी सकाळी खर्रा घेण्यासाठी प्रियदर्शिनी चौकातील पानटपरीवर उभ्या असलेल्या कैलास डोंगी (२४) नामक युवकावर पानटपरीला लागून असलेली सुरक्षा भिंत कोसळली होती. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही भिंतही जीर्ण झाली होती. याशिवाय शहरात अनेक अशा भिंती जीर्ण झालेल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने या भिंती केव्हाही कोसळून अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.मनपाचे दुर्लक्षकाही इमारतींचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने ती इमारत धोकादायक असतानाही पाडता येत नसल्याचे नगर रचनाकार विभागाने सांगितले. शहरात तीन झोन कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी धोकादायक इमारतींची एकत्रित माहितीच मनपाकडे उपलब्ध नसल्याचेही यावेळी दिसून आले. स्ट्रक्चरल आॅडिट संदर्भात विचारणा केली असता, माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धोकादायक इमारतींविषयी मनपा किती दक्ष आहे, हे दिसून येते.