शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात आठ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:38 IST

मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्दे मनपाचे अफलातून सर्वेक्षण : मुंबईसारखी घटना घडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून चंद्रपूर शहरातही अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून चंद्रपुरातील अशा निर्लेखित इमारतींची माहिती घेतली असता चंद्रपुरात केवळ आठच इमारती जीर्ण असल्याची माहिती मिळाली. या इमारत मालकांना केवळ नोटीस बजाविण्यापलिकडे मनपाने काहीही केलेले नाही. त्यामुळे मुंबईसारखी घटना घडल्यास अनेकांना प्राण गमवावे लागण्याची शक्यता आहे.धोकादायक व जीर्ण इमारतींबाबत दरवर्षी स्थानिक प्रशासनाकडून सर्व्हेक्षण केले जाते. याशिवाय नागरिकांच्या तक्रारीवरूनही धोकादायक इमारतींची नोंद केली जाते. मात्र चंद्रपूर महानगर पालिकेने यावर्षी धोकादायक व जीर्ण इमारतींचे सर्व्हेक्षणच केले नसल्याची माहिती आहे. नगर रचनाकार विभागात याबाबत माहिती जाणून घेतली असता, शहरात केवळ आठच इमारती धोकादायक असून त्या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.मनपाने हा आकडा सांगितला असला तरी प्रत्यक्षात शहरात स्थिती वेगळी आहे. शहरात आठपेक्षा अधिक इमारती कालबाह्य आणि धोकादायक झाल्याचे शहरात फेरफटका मारला असता दिसून येते. काही इमारतींच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत तर काही लहानसहान घरांचे छत कोसळण्याच्या स्थितीत आहेत.महानगरपालिकेच्या सर्व्हेक्षणात केवळ आठ इमारतीच धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. या इमारत मालकांना नोटीस बजावल्यानंतर घरमालकाने काय कार्यवाही केली, त्यांनी केली नसेल तर महापालिकेने काय कार्यवाही केली, अशी विचारणा केली असता, दोन वर्षांपूर्वी एक-दोन धोकादायक इमारती पाडण्यात आल्या होत्या. मात्र दोन वर्षांत अशी कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात आले.भिंत कोसळून गेला होता बळीसोमवारी सकाळी खर्रा घेण्यासाठी प्रियदर्शिनी चौकातील पानटपरीवर उभ्या असलेल्या कैलास डोंगी (२४) नामक युवकावर पानटपरीला लागून असलेली सुरक्षा भिंत कोसळली होती. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही भिंतही जीर्ण झाली होती. याशिवाय शहरात अनेक अशा भिंती जीर्ण झालेल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने या भिंती केव्हाही कोसळून अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.मनपाचे दुर्लक्षकाही इमारतींचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने ती इमारत धोकादायक असतानाही पाडता येत नसल्याचे नगर रचनाकार विभागाने सांगितले. शहरात तीन झोन कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी धोकादायक इमारतींची एकत्रित माहितीच मनपाकडे उपलब्ध नसल्याचेही यावेळी दिसून आले. स्ट्रक्चरल आॅडिट संदर्भात विचारणा केली असता, माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धोकादायक इमारतींविषयी मनपा किती दक्ष आहे, हे दिसून येते.