शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पदभरतीमधील जाचक अटी तातडीने रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:13 IST

जिल्हा परिषद अंतर्गत गट क सरळसेवा भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क वाढवून अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे जाचक अटी रद्द करण्याची मागणी तालुका रोजगार संघाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देबेरोजगार संघाची मागणी : तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : जिल्हा परिषद अंतर्गत गट क सरळसेवा भरतीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क वाढवून अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे जाचक अटी रद्द करण्याची मागणी तालुका रोजगार संघाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पदनिहाय व जिल्हानिहाय परीक्षा शुल्क भरण्याच्या सूचना संबंधित जाहिरातीमध्ये दिल्या आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १३ प्रकारच्या एकूण ४४२ पदांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. प्रत्येक पदासाठी खुल्या प्रवर्गाला ५०० रूपये व मागासवर्गीय २५० रूपये परीक्षा शुल्क भरण्याच्या अटी घालण्यात आल्या. सदर जाहिरातीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक जिल्ह्यात अर्ज करायचा असल्यास खुल्या प्रवर्गासाठी एका जिल्ह्यातील एकूण १३ पदांसाठी ६ हजार ५०० रूपये तर राज्यातील एकूण ४४२ पदांसाठी २ लाख २१ हजार रूपये व प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १३ पदांसाठी ३ हजार २४० व ४४२ पदांसाठी १ लाख १० हजार रूपये परीक्षा शुल्क मोजावे लागणार आहे.एवढी मोठी परीक्षा शुल्क घेऊन भरती प्रक्रिया राबविण्यामागे शासनाचा हेतू स्वच्छ नाही. यातून बेरोजगारांची आर्थिक लूट करून त्यांना करिअरपासून परावृत्त केल्या जात आहे. राज्य शासन विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत असल्यामुळे सामाजिक व राष्ट्रीय सलोखा व एकूनच घटनात्मक मूल्ये धोक्यात आली, असा आरोप निवेदनातून केला आहे. शासनाच्या अशा बेजबाबदार धोरणामुळे लाखो अन्यायग्रस्त बेरोजगार विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तातडीने रद्द करून सुधारित प्रक्रिया अमलात आणावी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे, अशी मागणी तालुका रोजगार संघाचे संघटक प्रा. नामदेव जेंगठे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ तहसीलदार चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. शिष्टमंडळात विजय मुळे, प्रदीप राऊत, ज्ञानज्योती, जवाहर, व दिशा ग्रंथालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांची आर्थिक लूटजि. प. मधील भरती प्रक्रियेत दोन अडीच लाख विद्यार्थी सहभागी झाल्यास शासनाला परीक्षा शुल्कापोटी सुमारे चार हजार कोटी होणार आहेत. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य शासन बेरोजगार विद्यार्थ्यांची लूट करीत आहे. हे भारतीय संविधातील कल्याणकारी तत्त्वाला धरून नाही. चुकीच्या अटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण केल्या जात आहे. हा प्रकार बंद करून पद भरतीच्या नवीन अटी लागू करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

टॅग्स :jobनोकरीzpजिल्हा परिषद