शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

ओबीसीविरोधी आदेश रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:30 IST

एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची संख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पण, केवळ २७ टक्के आरक्षण देण्यात आले. शासनाने ३१ जुलै २०१९ रोजी अध्यादेश काढून राज्यातील स्थानिक संस्थामधील इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग मिळून असलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसींच्या) आरक्षणात कपात केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना समता परिषदेचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची संख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पण, केवळ २७ टक्के आरक्षण देण्यात आले. शासनाने ३१ जुलै २०१९ रोजी अध्यादेश काढून राज्यातील स्थानिक संस्थामधील इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग मिळून असलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसींच्या) आरक्षणात कपात केली आहे. त्यामुळे हा आदेश रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फु ले समता परिषदेने निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.राज्यघटनेच्या कलम २४३ अनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय रचना आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम १२ (२) (अ) (ब) नुसार सदर पंचायतीमधील लोकसंख्या प्रमाणात जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या तरतुदीला डावलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६१ यामध्ये आणखी सुधारणा करून स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षण ५० टक्केच्या मर्यादेत ठेवण्यासाठी दुरूस्ती करून ओबीसीचे आरक्षण कमी केले आहे. ग्रामपंचायत, जि. प. पंचायत समित्यामधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी केलेल्या आरक्षणाची मर्यादा विचारात घेतल्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींकरिता देण्यात येणारे आरक्षण हे ५० टक्के पेक्षा अधिक होत असेल तेव्हा अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम ठेवावे. पण, ओबीसींचे आरक्षण कमी करू नये. अनुसूचित जाती व जमातींना स्वराज्य संस्थेम लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे ३३ टक्के आरक्षण मिळत आहे. मर्यादा कायम ठेवण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालू नये, अशी मागणी अध्यक्ष जगदीश जुनगरी, राजु साखरकर, केशव ठाकरे, संध्या दुधलकर, प्रा. विजय लोणबले, संजय चौधरी, सिद्धार्थ पडवेकर, राजकुमार भगत, विजयश्री माटे, सविता पोतराजे, सुरेखा आष्टणकर यांनी केली.शासनाने न्यायालयात बाजू मांडावी५० टक्क्यांच्या वर आरक्षण नको, या न्यायालयाच्या टिपणीचा आधार घेऊन सरकार ओबीसी समाजाचे आरक्षण कपात करत आहे. शिवाय, भारतीय संविधानातील तरतुदींकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. आरक्षणाला ५० टक्के मर्यादा हा अंतिम निर्णय नाही, असे केंद्र सरकारनेच ३१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शपथ पत्राद्धारे नमुद केले. त्यामुळे हा बागुलबुवा न करता सरकारने ओबीसींचा प्रश्न न्यायालयात प्रभावीपणे मांडावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.