शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ओबीसीविरोधी आदेश रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:30 IST

एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची संख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पण, केवळ २७ टक्के आरक्षण देण्यात आले. शासनाने ३१ जुलै २०१९ रोजी अध्यादेश काढून राज्यातील स्थानिक संस्थामधील इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग मिळून असलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसींच्या) आरक्षणात कपात केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना समता परिषदेचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची संख्या ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पण, केवळ २७ टक्के आरक्षण देण्यात आले. शासनाने ३१ जुलै २०१९ रोजी अध्यादेश काढून राज्यातील स्थानिक संस्थामधील इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग मिळून असलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसींच्या) आरक्षणात कपात केली आहे. त्यामुळे हा आदेश रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फु ले समता परिषदेने निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.राज्यघटनेच्या कलम २४३ अनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय रचना आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम १२ (२) (अ) (ब) नुसार सदर पंचायतीमधील लोकसंख्या प्रमाणात जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या तरतुदीला डावलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६१ यामध्ये आणखी सुधारणा करून स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षण ५० टक्केच्या मर्यादेत ठेवण्यासाठी दुरूस्ती करून ओबीसीचे आरक्षण कमी केले आहे. ग्रामपंचायत, जि. प. पंचायत समित्यामधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी केलेल्या आरक्षणाची मर्यादा विचारात घेतल्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींकरिता देण्यात येणारे आरक्षण हे ५० टक्के पेक्षा अधिक होत असेल तेव्हा अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम ठेवावे. पण, ओबीसींचे आरक्षण कमी करू नये. अनुसूचित जाती व जमातींना स्वराज्य संस्थेम लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे ३३ टक्के आरक्षण मिळत आहे. मर्यादा कायम ठेवण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालू नये, अशी मागणी अध्यक्ष जगदीश जुनगरी, राजु साखरकर, केशव ठाकरे, संध्या दुधलकर, प्रा. विजय लोणबले, संजय चौधरी, सिद्धार्थ पडवेकर, राजकुमार भगत, विजयश्री माटे, सविता पोतराजे, सुरेखा आष्टणकर यांनी केली.शासनाने न्यायालयात बाजू मांडावी५० टक्क्यांच्या वर आरक्षण नको, या न्यायालयाच्या टिपणीचा आधार घेऊन सरकार ओबीसी समाजाचे आरक्षण कपात करत आहे. शिवाय, भारतीय संविधानातील तरतुदींकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. आरक्षणाला ५० टक्के मर्यादा हा अंतिम निर्णय नाही, असे केंद्र सरकारनेच ३१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शपथ पत्राद्धारे नमुद केले. त्यामुळे हा बागुलबुवा न करता सरकारने ओबीसींचा प्रश्न न्यायालयात प्रभावीपणे मांडावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.