शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मृत्यूच्या ‘त्या’ घाटावर कालवा आणि पूलही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:31 IST

नागाभीड : गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडवसाठी मृत्यूचा घाटच ठरला होता. मात्र आता पुलासह कालव्याचेही ...

नागाभीड : गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडवसाठी मृत्यूचा घाटच ठरला होता. मात्र आता पुलासह कालव्याचेही काम करण्यात आले आहे. परिणामी या कालव्याबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती दूर झाली आहे.

गोसेखुर्द धरणाचा मुख्य उजवा कालवा ब्रम्हपुरी तालुक्यातून आसोला मेंढा तलावाकडे गेला आहे. या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून मौशीमार्गे नवेगाव पांडव येथून गोंडपिपरीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून नागभीड तालुक्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार, असे अगोदर सांगण्यात येत होते. मात्र ही केवळ भूल होती. नागभीड तालुका तांत्रिक कारणांमुळे या कालव्याच्या सिंचनापासून वंचितच राहणार आहे.

या उपकालव्याचे काम सलगपणे पूर्ण झाले नाही. खंड खंड स्वरूपात कालव्याचे काम झाले असल्याने या कालव्याला अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. जवळपास १२ वर्षांपूर्वी या उपकालव्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात शासनाने या कालव्याबाबत हात आखडते घेतल्याने कालव्याचे काम बंद पडले होते. त्यामुळे हा कालवा जिवावर उठला होता.

बॉक्स

पाच जणांचे गेले बळी

नवेगाव पांडवकडून बाळापूरकडे एक रस्ता जातो. या रस्त्याने परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिक प्रवास करीत असल्याने अतिशय वर्दळ या रस्त्याने असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कालव्याचे काम करण्यात आल्याने दोन्ही बाजूला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. कालवा गावाला लागूनच असल्याने कधी शौचास गेलेल्या, तर कधी अनवधानाने या कालव्याने नवेगाव पांडव येथीलच ५ व्यक्तींचा बळी घेतला होता. कमलेश राहाटे, कुमार पांडव, मोरेश्वर विठोबा तिजारे, लक्ष्मण मारोती सालोरकर व एक अन्य असे पाचजण नहराचे बळी ठरले होते. आता कालव्यासह पुलाचेही काम करण्यात आले आहे.

120821\img-20210812-wa0031.jpg

तयार करण्यात येत असलेल्या कालव्यावरील पूल