शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

विकत घ्यावे लागते पाणी !

By admin | Updated: April 11, 2016 00:52 IST

ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाटण ग्रामपंचायतमधील सितागुडा येथील कोलाम आदिवासी बांधवांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागते.

अनेक वर्षांपासून नळाचे पाणीच नाही : विहिरीतच नाही तर पोवऱ्यात कुठून येणार ?शंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवतीग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाटण ग्रामपंचायतमधील सितागुडा येथील कोलाम आदिवासी बांधवांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागते. अनेक वर्षांपासून येथे नळ योजना नाही. गावाजवळील विहिरीने तळ गाठला आहे. गावात एकच हातपंप आहे. त्यावर संपूर्ण गाव अवलंबून आहे. हातपंपाची पातळीही आता खालावली आहे. गावात कुठलेही कार्यक्रम असले की या आदिवासी कोलम बांधवांना पोटाला चिमटा घेऊन पाणी खरेदी करावे लागते. हे विदारक वास्तव लोकमतने आॅन दी स्पॉट भेट देऊन समोर आणले आहे.पाटण तालुक्यातील सितागुडा कोलाम वस्तीची लोकसंख्या ३८० असून ५० कुटुंब वास्तव्यास आहेत. संपूर्ण कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने या गावात कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे येथील पाणी समस्या वर्षानुवर्षे तिव्र स्वरूप धारण करीत आहे. ग्रामपंचायतीच्या वेळकाढू धोरण पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहे. प्रशासक व ग्रामविकास्तार अधिकारी यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळेच ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. ग्रामस्थांना लग्न कार्य असो की कुठलाही कार्यक्रम. चक्क पाणी विकत घ्यावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून संबंधित अधिकारी यांच्या भोंगळ कारभारामुळे कोलाम बांधवांना अव्याच्या सव्वा भावाने पाणी खरेदी करावे लागत आहे. नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार जास्तीत जास्त ग्रामविकास अधिकारी जागेवरच बसून करीत असल्याचे गावकरी सांगत आहे.ग्राम विस्तार अधिकाऱ्यांना देणेघेणे नाही\नऊ सदस्यीय संख्या असलेल्या पाटण ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी हे नियमित ग्रामपंचायतीला येत नाहीत. आले तरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात कधी जात नाही. लोकांच्या समस्या कधी जाणून घेत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गाव अनेक वर्षांपासून पाण्यासाठी टाहो फोडत आहे. मात्र ग्राम विस्तार अधिकारी मूग गिळून आहेत. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. विकासकामाला खीळआदिवासी कोलाम बांधवांच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र पाटण ग्रामपंचायतमधील जनकापूर (को), जनकापूर (कोलामगुडा), लच्छागुडा, पाटागुडा, सितागुडा या गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. काही लोकांचे घरकुलाचे काम सुरु आहे. मात्र अनेक जण अजूनही झोपडीतच जीवन कंठीत आहेत.