शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर पिकांची खरेदी

By admin | Updated: February 23, 2017 00:40 IST

शासन निर्णयाप्रमाणे तुरीची आधारभूत किंमत प्रतीक्विंटल ५ हजार ५० अशी ठरविण्यात आली असली,...

शेतकऱ्यांचे नुकसान : राजुरा बाजार समितीतील प्रकारचंद्रपूर : शासन निर्णयाप्रमाणे तुरीची आधारभूत किंमत प्रतीक्विंटल ५ हजार ५० अशी ठरविण्यात आली असली, तर राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या नियमाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. येथील शेतकऱ्यांना व्यापारी प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार १०० भाव देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल मागे एक हजाराचे नुकसान होत आहे.शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण रोखण्याकरिता शासनाकडून हमीभाव ठरवून देण्यात येतो. शेतमालाच्या दर्जाप्रमाणे भाव दिला जातो. हे धान्य शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायचे असते. याचप्रमाणे तुरीचे भाव प्रतिक्विंटल ५ हजार ५० याप्रमाणे खरेदी करण्याचे निर्देश कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आले आहे.असे असले तरी राजुरा येथे मात्र या नियमाला वाटाण्याचा अक्षता दाखविण्यात येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात आल्यामुळे तुरीचे उत्पादनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्यापारी ४ हजार ते ४ हजार १०० रुपयांप्रमाणे तूर पिक खरेदी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर येथील बाजार समितीमध्ये हमीभावावर तारण योजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी केली जात आहे. यामुळे हमीभाव मिळावा, याकरिता राजुरा तालुक्यातील शेतकरी चंद्रपूर येथील बाजार समितीकडे धाव घेत आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या बाजार समितीमध्येच असा प्रकार घडत असतानाही यावर आळा घातला जाऊ शकत नाही. त्यामुळे इतर ठिकाणी खासगी व्यापारी किती भाव देत असेल, हा प्रश्नच आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य कारवाई करण्याची मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)...तर आंदोलन करणारतुरीचा हमीभाव निश्चित करण्यात आला असतानाही या नियमांना तिलांजली देण्यात येत आहे. यातून आर्थिक शोषण होत आहे. याकरिता तारण योजना लागू करावी. तसेच भारतीय खाद्य निगमचे खरेदी केंद्र उघडावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.हमीभावाची प्रक्रियाहमीभावानुसार शेतमालाला भाव मिळण्याकरिता शेताचा सातबारा, बँकेचे पासबुक याची आवश्यकता असते. तसेच मालाचा दर्जा पाहून ठरलेला भाव दिला जातो. मात्र, शासनाच्या नियमाकडे राजुरा येथील बाजार समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे.