शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

तालुका ठिकाण असूनही बसेस अनियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST

जिवती तालुका हा पहाडावर वसला असून याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. कोविडच्या अगोदर तालुक्यात बसेस नियमितपणे सुरू होत्या. ...

जिवती तालुका हा पहाडावर वसला असून याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. कोविडच्या अगोदर तालुक्यात बसेस नियमितपणे सुरू होत्या. त्यानंतर कोविडकाळ आला. त्यामुळे बसेस बंद करण्यात आल्या. परंतु सध्या गेल्या महिनाभरापासून साधारण परिस्थिती लक्षात घेता महामंडळाने तालुक्यातील बसेस सुरू करायला पाहिजे. परंतु आगार प्रमुखाचे जिवती तालुक्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे.

सध्या काही शाळा, कॉलेज सुरू झाल्या असून इतर प्रवासीसुद्धा राजुरा, गडचांदूर, चंद्रपूरसारख्या ठिकाणी जाऊ लागले आहेत. मात्र त्यांना खासगी वाहनाने जावे लागते किंवा ताटकळत वाहनांची वाट पाहावी लागते. मग जिल्ह्याचा एक भाग असलेल्या या तालुक्यात बसेस का सोडण्यात येत नाही, असा प्रश्न तालुकावसीयांना पडत आहे. बऱ्याचदा जीवतीसाठी गडचांदूर बसस्थानकावर बसेस लागतात. पण प्रवासी नसल्याचे कारण सांगत वाहक व चालक जिवतीचा फलक बदलवून चंद्रपूर, राजुरा परत जातात. यावरून जिवती तालुक्याकडे कसे दुर्लक्ष करतात, हे दिसून येते.

कोट

जिवती तालुक्यासाठी बस सोडणे म्हणजे महामंडळाला तोटा सहन करणे आहे. या तालुक्यासाठी प्रवासी नसतात. त्यामुळे आमचा डिझेल व कर्मचाऱ्यांचा खर्च निघत नाही. त्यामुळे आम्हाला जिवतीसाठी बस सोडणे शक्य नाही.

- आशिष मेश्राम ,आगार व्यवस्थापक, राजुरा