शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

जळणाऱ्या रोहित्रांवर राहणार नजर

By admin | Updated: November 23, 2014 23:16 IST

अनधिकृत वीज वापर, जास्त क्षमतेचे कृषी पंप वापर यामुळे रोहित्रे जळत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसोबत महावितरणला बसत आहे. यावर उपाय म्हणून महावितरण

चंद्रपूर : अनधिकृत वीज वापर, जास्त क्षमतेचे कृषी पंप वापर यामुळे रोहित्रे जळत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसोबत महावितरणला बसत आहे. यावर उपाय म्हणून महावितरण आता जळणाऱ्या रोहित्रांची झडती घेणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांना अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर परिमंडळात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या परिमंडळात २४ हजार रोहित्रे आहेत. मुळात रोहित्र अतिभारीत असल्याशिवाय जळत नाही. विजेचा अनधिकृत वापर किंवा मंजूर भारापेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारीचा वापर झाल्यामुळे रोहित्रे जळतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी अनधिकृत वापरावर वीज चोरीची कारवाई करावी, वीज चोरी थांबविल्याशिवाय रोहित्र देऊ नये, अशा स्पष्ट सूचना यापूर्वीच क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. नागपूर परिमंडळात येणाऱ्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात १ हजार २९० रोहित्रांमध्ये बिघाड आला. रोहित्रात बिघाड आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. तक्रारींच्या आधारे एक हजार २६५ रोहित्रांची दुरुस्ती महावितरणतर्फे करण्यात आली. अजूनही काही रोहित्रांच्या दुरुस्तीचे काम महावितरणतर्फे सुरू आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने आता महावितरणने जळणाऱ्या रोहित्रांची झडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अहवाल पाठविण्याचे निर्देशही क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले. यात संबंधितांची जबाबदारी निश्चित करता यावी, यासाठी महावितरण मुख्यालयाने ज्या भागात रोहित्र जळाले आहे, ते गाव, विभाग, उपविभाग, उपविभागाचे प्रमुख आणि रोहित्राची जबाबदारी असलेल्या लाईनमनचे नाव याबाबतचा रोहित्र निहाय तपशील दररोज मुख्यालयात पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. या माहितीचा अभ्यास करून पुढील कारवाई केली जाणार आहे. महावितरणच्या नव्या निर्देशामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)