शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

१८ गावांचा डोलारा एकट्या चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:32 IST

परिचारिकांची पदे रिक्त : रुग्णांची होतेय गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्क मूल: ग्रामीण भागातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र रिक्त पदांच्या ग्रहणाने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मूल तालुक्यातील चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १८ गावांचा डोलारा असून परिचारिकाची पदे रिक्त असल्याने सेवा देण्यास अडचण निर्माण होत आहे. गैरसोय टाळण्यासाठी रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.

लांब अंतरावर जाऊन उपचार करणे ग्रामीण जनतेला अडचणीचे होत असल्याने गावाजवळच उपचार करता यावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील चिरोलीअंतर्गत १८ गावे येत असून यात चिरोली, जानाळा, फुलझरी, आगडी, कांतापेठ, टोलेवाही, केळझर, खालवसपेठ, सुशी दाबगाव, दाबगाव मक्ता, नलेश्वर, भगवानपूर, व इतर गावांचा समावेश आहे. या गावातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात.

त्यांना योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय यंत्रणा सज्ज असली पाहिजे मात्र वैद्यकीय अधिकारी असेल तरी परिचारिकाची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे तात्पुरता दिलासा देत रुग्णांवर उपचार सुरू असले तरी ही उपाययोजना तोकड्या स्वरूपात आहे. दररोज शेकडो रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात. त्यामुळे सर्वांना योग्य उपचार करणे कठीण जात आहे. आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी नेमणे आवश्यक आहे. मात्र रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक रुग्णांवर उपचार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याकडे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

"करोडो रुपये खर्च करून चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी सर्व सुविधा व कर्मचारी नेमले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अनेक वर्षांपासून परिचारिकांची पदे रिक्त आहेत. रुग्णाला सलाईन लावल्यानंतर ते काढण्यासाठी बऱ्याच वेळानंतर परिचारिका येत असतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे." -स्वी वाळके, सामजिक कार्यकर्ते दाबगाव मक्ता.

"प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही परिचारिकांची पदे रिक्त आहेत. तसेच शासनाचे क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी बीसीजी लस देण्याची मोहीम आणली आहे. त्यामुळे परिचारिकांना लस देण्यासाठी पाठविण्यात आले आहे. रिक्त असलेल्या पदाची पूर्तता होणे गरजेचे आहे." -डॉ. अश्विनी रामटेके, वैद्यकीय अधिकारी चिरोली

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर