शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

बीएसएनएलची इंटरनेट सेवा ‘डेड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:58 IST

‘कनेक्टिंग पीपल्स’ असे ब्रीद असलेल्या भारत दूरसंचार निगमची इंटरनेट सेवा सध्या ‘डेड’ झाली आहे.

ठळक मुद्देसेवेप्रती ग्राहकांमध्ये प्रचंड रोष : शासकीय-निमशासकीय कार्यालयांची कामे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘कनेक्टिंग पीपल्स’ असे ब्रीद असलेल्या भारत दूरसंचार निगमची इंटरनेट सेवा सध्या ‘डेड’ झाली आहे. गलेलठ्ठ वेतन घेणाºया अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे बीएसएनएलचे शेकडो ग्राहक कमी झाले असतानाही कमी दराच्या इंटरनेट सेवेमुळे काही ग्राहक टिकून आहेत. मात्र या सेवेत दिवसातून अनेकदा बिघाड येत असल्याने इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे शासकीय-निमशासकीय कार्यालयांचे कामकाज दररोज प्रभावित होत असून या सेवेप्रती ग्राहकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.शासकीय कंपनी असलेल्या बीएसएनएलचे जिल्हाभरात जवळपास एक लाख ४० हजार मोबाईलधारक तर २२ हजारच्यावर टेलीफोनधारक ग्राहक आहेत. मात्र योग्य सेवा मिळत नसल्याने गेल्या चार ते पाच वर्षांत अनेक ग्राहकांनी खासगी दूरसंचार कंपन्यांचा आधार घेत मोबाईल व टेलीफोनसेवा बंद केली आहे. त्यामुळे जवळपास १० हजार टेलीफोनधारक तर ३७ हजारच्या जवळपास मोबाईलधारक ग्राहक कमी झाले आहेत.बीएसएनएलच्या भ्रमनध्वनी सेवेत बिघाड हा नित्याचाच झाला असल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत भ्रमणध्वनी सेवेचे जाळे पसरविण्याचे काम बीएसएनएल कंपनीकडून झाले आहे.अनेक गावात भ्रमनध्वनी सेवा बीएसएनएलच्या माध्यमातून पोहोचली आहे. मात्र सेवेत येत असलेला बिघाड ग्राहकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. त्यातच अनेक खासगी कंपन्या गावागावात पोहचल्या असून विविध योजना राबवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत आहेत. मात्र त्या तुलनेत बीएसएनएल कंपनी मागे पडत असल्याने ग्राहक खासगी कंपनीकडे वळले असल्याचे दिसून येते.तक्रारीनंतरही इंटरनेट सेवा जैसे थेएखाद्या शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा खंडीत झाल्यास तक्रार केली जाते. या तक्रारीनंतर बीएसएनएलचा कर्मचारी येऊन तपासणी करतो. मात्र त्यानंतरही बिघाड दूर न झाल्यास आयटी सेक्शनकडे तक्रार केली जाते. मात्र त्यानंतरही बिघाड दूर होत नसल्याची अनेक निमशासकीय कार्यालयाची तक्रार आहे. याकडे मात्र बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असून तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत असतात.खासगी कंपन्या पडताहेत भारीदूरसंचार क्षेत्रात विविध खासगी कंपन्या उतरल्या असून या कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल कंपनी मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. इंटरनेट सेवा, एसएमएस सेवा, रोमिंग, कॉलिंंग दर हे विविध कंपन्यांचे वेगवेगळे आहेत. या तुलनेत बीएसएनएलचे दर अधिक असल्याचे ग्राहक सांगतात.टॉवर उभारण्यास दिरंगाईदूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल ही एकच शासकीय कंपनी कार्यरत असताना भविष्यातील विचार करून अनेक गावात टॉवर उभारणीसाठी रस्त्यात केबल टाकण्यात आले. मात्र आधुनिकीकरणात नव्याने रस्ते तयार झाले आहेत. यात बीएसएनएलने रस्त्यात टाकलेले केबल तुटले असून आता नव्याने केबल टाकण्यास दिरंगाई होत आहे. तर दुसरीकडे खासगी कंपन्या अतिरीक्त पैसे मोजून केबल टाकण्यासाठी पाऊले उचलतात. त्यामुळे ग्रामीण भागातही खासगी सेवेचे ग्राहक वाढले आहेत. परिणामी भारत दूर संचार निगमचे अनेक ग्राहक आता सीमकार्ड व टेलीफोन बंद करण्याच्या स्थितीत आहेत.परवानगीसाठी अडकतात कामेएखाद्या गावात टॉवर उभारणी किंवा केबल टाकण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागत असते. यात वरिष्ठांकडून दिरंगाई केली जाते. तर खासगी कंपन्या यात सरस ठरतात. त्यामुळे ग्राहकांचा कल खासगी सेवेकडे वळला असल्याची माहिती खुद्द बीएसएनएलच्या एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.बीएसएनएलच्या बंगलोर कार्यालयातून अनेक प्लॅन बदलले आहेत. तसेच प्रोफाईलमध्येही बदल झालेला असल्याने एखाद्या कार्यालयाची इंटरनेट सेवा खंडीत होत असते. बरेचदा केबल लाईनमध्येही बिघाड निर्माण होत असल्याने सेवा खंडीत होते.- रमेश रामटेके,मंडळ अभियंता (शहरी)