शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात सावळा गोंधळ

By admin | Updated: May 8, 2014 01:54 IST

गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा, चुकांचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

विद्यार्थी संभ्रमात : अभ्यासक्रमात संदर्भसूचीचा समावेश नाहीवरोरा : गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा, चुकांचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सध्या गोंडवाना विद्यापीठाने नव्यानेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात संदर्भसूचिचा समावेश करण्यात आला नसल्याने गोंडवाना विद्यापीठाचा सावळा गोंधळ लक्षात येतो. याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे.नव्यानेच स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठात अनेक विषयात पदव्युत्तर परीक्षेचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. संबंधित विषयाचा अभ्यासक्रम अभ्यास मंडळाकडून तयार करण्यात आला आहे.तज्ज्ञाकडून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम गोंधळात टाकणारा असल्याचे दिसून येत आहे. इंग्रजी विषयामध्ये एम.ए. भाग-१ ला एकूण दोन सेमीस्टरसह आठ पेपर्स देण्यात आले आहेत. प्रत्येक पेपरमध्ये विद्यार्थ्यांना १६गुणांचे प्रश्न बॅगराऊंड स्टडीजवर विचारले जातात. त्यामुळे आठही पेपर्समध्ये विद्यार्थ्यांना हा भाग अनिवार्य आहे. परंतु सदर टॉपीक कुठून मिळणार, याकरिता लागणारा संदर्भ ग्रंथ मात्र अभ्यासक्रमात देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. तसेच प्रथम सेमीस्टरमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले व त्यांनी दिलेल्या एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तर तो पेपर पुन: देण्याची मुभा सर्वच विद्यापिठात आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठ याला अपवाद ठरले आहे. विद्यार्थी आपले परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरत असताना त्यात केवळ अनुत्तीर्ण विषयच भरता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी गुण मिळत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांना नेट, सेट या पात्रता परीक्षेपासून वंचित रहावे लागणार असल्याने पदव्युत्तर शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना बेरोजगार रहावे लागणार असल्याने मानले जात आहे.या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्‍याशी संपर्क साधला असता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा असली पाहिजे, हे मान्य करीत विद्यापीठ यावर विचार करीत असल्याची माहिती नाव प्रकाशित करू नये या अटीवर दिली. पदव्युत्तर विद्यार्थ्याचे नुकसान टाळावे याकरिता विद्यापीठाने सदर विषय गांभीर्याने घेणे आता गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)