शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

गोंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात सावळा गोंधळ

By admin | Updated: May 8, 2014 01:54 IST

गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा, चुकांचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

विद्यार्थी संभ्रमात : अभ्यासक्रमात संदर्भसूचीचा समावेश नाहीवरोरा : गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा, चुकांचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सध्या गोंडवाना विद्यापीठाने नव्यानेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात संदर्भसूचिचा समावेश करण्यात आला नसल्याने गोंडवाना विद्यापीठाचा सावळा गोंधळ लक्षात येतो. याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे.नव्यानेच स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठात अनेक विषयात पदव्युत्तर परीक्षेचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. संबंधित विषयाचा अभ्यासक्रम अभ्यास मंडळाकडून तयार करण्यात आला आहे.तज्ज्ञाकडून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम गोंधळात टाकणारा असल्याचे दिसून येत आहे. इंग्रजी विषयामध्ये एम.ए. भाग-१ ला एकूण दोन सेमीस्टरसह आठ पेपर्स देण्यात आले आहेत. प्रत्येक पेपरमध्ये विद्यार्थ्यांना १६गुणांचे प्रश्न बॅगराऊंड स्टडीजवर विचारले जातात. त्यामुळे आठही पेपर्समध्ये विद्यार्थ्यांना हा भाग अनिवार्य आहे. परंतु सदर टॉपीक कुठून मिळणार, याकरिता लागणारा संदर्भ ग्रंथ मात्र अभ्यासक्रमात देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. तसेच प्रथम सेमीस्टरमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले व त्यांनी दिलेल्या एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तर तो पेपर पुन: देण्याची मुभा सर्वच विद्यापिठात आहे. मात्र गोंडवाना विद्यापीठ याला अपवाद ठरले आहे. विद्यार्थी आपले परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरत असताना त्यात केवळ अनुत्तीर्ण विषयच भरता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी गुण मिळत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांना नेट, सेट या पात्रता परीक्षेपासून वंचित रहावे लागणार असल्याने पदव्युत्तर शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना बेरोजगार रहावे लागणार असल्याने मानले जात आहे.या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्‍याशी संपर्क साधला असता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा असली पाहिजे, हे मान्य करीत विद्यापीठ यावर विचार करीत असल्याची माहिती नाव प्रकाशित करू नये या अटीवर दिली. पदव्युत्तर विद्यार्थ्याचे नुकसान टाळावे याकरिता विद्यापीठाने सदर विषय गांभीर्याने घेणे आता गरजेचे झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)