शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीगुड्याकडे जाणारा पूल कोसळला

By admin | Updated: May 15, 2014 01:04 IST

नागरिकांना दळणवळणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाने गाव तिथे रस्ता ही योजना राबविली. या अंतर्गत लाखो रुपये..

राजुरा : नागरिकांना दळणवळणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाने गाव तिथे रस्ता ही योजना राबविली. या अंतर्गत लाखो रुपये खचरून मच्छीगुडा या गावाकडे जाण्यासाठी रस्ता व पूल तयार केला. हा पुल पावसाळ्यात अर्धाअधिक वाहून गेला. तर उर्वरित पूल कोसळला आहे. आता या पुलापुढे मोठा खड्डा पडला असून नागरिकांना गावाकडे जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.डोंगराळ व दुर्गम गावापर्यंत जाण्यासाठी शासनाने रस्त्याचे जाळे विणले. यासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र नियोजनाअभावी निकृष्ठ कामे केली जात आहे.दोन वर्षापूर्वीच मच्छिगुडा या गावाकडे जाणारा रस्ता आणि त्या गावाला जोडणारा पुल बांधण्यात आला. पुलासारखा दिसणार्‍या रपट्याच्या बांधकामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र पूल कोसळल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी गिट्टी उखडली आहे. अत्यंत कमी उंचीचा पुल तयार करण्यात आल्याने याच पुलापुढे मोठा खड्डा पडला आहे.या गावाकडे जायचे असल्यास वाहन जात नाही. पाच किलोमिटर पायदळ जावे लागते. हा पुल व गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला. त्यामुळे तो तयार झाल्यानंतर काही काळातच त्याची दुरवस्था झाली. अतिदुर्गम भागातील गावांना इतर गावाशी जोडण्याच्या उद्देशाने हा भारी ते मच्छीगुडा रस्ता शासनाने तयार केला.परंतु कंत्राटदार आणि या कामावर देखरेख करणार्‍या अभियंत्याच्या नियोजन शून्य कारभारामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करण्यात आला. पुलाची उंचीसुद्धा अत्यंत कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात अर्धा पूल वाहून गेला. या कामात केवळ पैशाची उधळपट्टी झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.रस्ता व पुलाच्या कामाची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी होणे गरजेचे आहे. जोपर्यंत ग्रामीण भागातील कामाची पाहणी योग्य होणार नाही, तोपर्यंत असाच भोंगळ कारभार सुरू राहील. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या योजना ग्रामीण क्षेत्रात पोहचूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.ग्रामीण भागात रस्ता तयार करण्यासाठी शासन मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करतात. परंतु कमीशन पद्धतीमुळे ग्रामीण भागाच्या विकासापेक्षा अन्य व्यक्तींचाच विकास होताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)