शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

भारनियमनाचा रबीलाही बसणार फटका

By admin | Updated: October 30, 2015 01:15 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले.

कधी सुधारणार परिस्थिती : पेरणीला होतोयं उशीरमाजरी : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले. अवकाळी पाऊस, सुसाट वादळ- वारा आणि काही भागात सुका दुष्काळ आदी संकटामुळे खरीप पिकाच्या उत्पादनात घट आली. या संकटातून शेतकरी दादा कसाबसा सावरला. तोच आता रब्बी पिकांवरही विजेच्या भारनियमनाचे संकट ओढवले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.रोजच विद्युत भारनियमनाच्या नावावर सिंगल फेस विद्युत पुरवठा होतो आणि त्याचा वेळही ठराविक नाही. अचानक विद्युत पुरवठ्यात कमी-जास्त दाब होत असल्याने शेतकऱ्यांच्या कृषीपंपात बिघाड होत आहे. काही शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या मोटारी जळल्यात. यामुळे पाणी असून शेतात ओलीत करु शकत नाही आणि रबी पिकांच्या पेरणीला विलंब होत असल्याच्या तक्रारी आहे. पूर्वीच जंगली डुक्कर व रोही यामुळे शेतीचे नुकसान झाले. यापुढेही वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होणार यात शंका नाही. अशातच विद्युत पुरवठ्यामध्ये गैरसोय झाल्यास रबीची पेरणी करायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.राज्य सरकारच्या विद्युत कंपनीला महावितरण असे संबोधले जाते. मात्र प्रत्यक्षात वीज वितरणाची सोय पाहता महावितरण न म्हणता महामरण असेच म्हणण्याची पाळी आली आहे. या शब्दात बळीराजा रोष व्यक्त करीत आहे.सद्यस्थितीत सर्वच जलाशयात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळसाही पुरवठा होत आहे. आणि वीज निर्मीती करणारे अधिकारी - कर्मचारी रोज सेवा देत आहे. एवढी सारी जमेची बाजू असताना विद्युत पुरवठ्याची गैरसोय ग्रामीण नागरिक व बळीराजावर का ओढवली जाते, असा प्रश्न या निमित्ताने ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या अथवा कोणत्याही कारणाने शेतीचे नुकसान झाल्यावर आणि सर्वत्र आंदोलने छेडल्यानंतर मदतीचे पाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली जातात. निवडणुकीच्या वेळी बळीराजाला पुढारी- नेत्यांकडून समस्या सोडविण्याचा लालीपॉप दाखविला जातो. मात्र ऐन संकटकाळी साऱ्यांकडूनच पाठ फिरविली जात असल्याचा शेतकरी व ग्रामस्थ यांचा आरोप आहे.शेतकऱ्यांना खरी गरज असेल ती सिंचन व्यवस्था, २४ तास योग्य दाब असलेला वीज पुरवठा, स्वस्त दरात बि-बियाणे, खत, कृषी साहित्य, शेतीमालाला योग्य भाव आणि संकटकाळी सरकारी मदत याची. ही मदत शासकीय यंत्रणांनी पुरवावी, अशी बळीराजाची अपेक्षा आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचे दिवस सुधारणार आहे, अन्यथा त्यांची चिंता कायमच राहणार आहे. (वार्ताहर)