शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

भारनियमनाचा रबीलाही बसणार फटका

By admin | Updated: October 30, 2015 01:15 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले.

कधी सुधारणार परिस्थिती : पेरणीला होतोयं उशीरमाजरी : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले. अवकाळी पाऊस, सुसाट वादळ- वारा आणि काही भागात सुका दुष्काळ आदी संकटामुळे खरीप पिकाच्या उत्पादनात घट आली. या संकटातून शेतकरी दादा कसाबसा सावरला. तोच आता रब्बी पिकांवरही विजेच्या भारनियमनाचे संकट ओढवले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.रोजच विद्युत भारनियमनाच्या नावावर सिंगल फेस विद्युत पुरवठा होतो आणि त्याचा वेळही ठराविक नाही. अचानक विद्युत पुरवठ्यात कमी-जास्त दाब होत असल्याने शेतकऱ्यांच्या कृषीपंपात बिघाड होत आहे. काही शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या मोटारी जळल्यात. यामुळे पाणी असून शेतात ओलीत करु शकत नाही आणि रबी पिकांच्या पेरणीला विलंब होत असल्याच्या तक्रारी आहे. पूर्वीच जंगली डुक्कर व रोही यामुळे शेतीचे नुकसान झाले. यापुढेही वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होणार यात शंका नाही. अशातच विद्युत पुरवठ्यामध्ये गैरसोय झाल्यास रबीची पेरणी करायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.राज्य सरकारच्या विद्युत कंपनीला महावितरण असे संबोधले जाते. मात्र प्रत्यक्षात वीज वितरणाची सोय पाहता महावितरण न म्हणता महामरण असेच म्हणण्याची पाळी आली आहे. या शब्दात बळीराजा रोष व्यक्त करीत आहे.सद्यस्थितीत सर्वच जलाशयात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळसाही पुरवठा होत आहे. आणि वीज निर्मीती करणारे अधिकारी - कर्मचारी रोज सेवा देत आहे. एवढी सारी जमेची बाजू असताना विद्युत पुरवठ्याची गैरसोय ग्रामीण नागरिक व बळीराजावर का ओढवली जाते, असा प्रश्न या निमित्ताने ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या अथवा कोणत्याही कारणाने शेतीचे नुकसान झाल्यावर आणि सर्वत्र आंदोलने छेडल्यानंतर मदतीचे पाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली जातात. निवडणुकीच्या वेळी बळीराजाला पुढारी- नेत्यांकडून समस्या सोडविण्याचा लालीपॉप दाखविला जातो. मात्र ऐन संकटकाळी साऱ्यांकडूनच पाठ फिरविली जात असल्याचा शेतकरी व ग्रामस्थ यांचा आरोप आहे.शेतकऱ्यांना खरी गरज असेल ती सिंचन व्यवस्था, २४ तास योग्य दाब असलेला वीज पुरवठा, स्वस्त दरात बि-बियाणे, खत, कृषी साहित्य, शेतीमालाला योग्य भाव आणि संकटकाळी सरकारी मदत याची. ही मदत शासकीय यंत्रणांनी पुरवावी, अशी बळीराजाची अपेक्षा आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचे दिवस सुधारणार आहे, अन्यथा त्यांची चिंता कायमच राहणार आहे. (वार्ताहर)