शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचा रबीलाही बसणार फटका

By admin | Updated: October 30, 2015 01:15 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले.

कधी सुधारणार परिस्थिती : पेरणीला होतोयं उशीरमाजरी : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप पिकाची नासधुस झाली. बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले. अवकाळी पाऊस, सुसाट वादळ- वारा आणि काही भागात सुका दुष्काळ आदी संकटामुळे खरीप पिकाच्या उत्पादनात घट आली. या संकटातून शेतकरी दादा कसाबसा सावरला. तोच आता रब्बी पिकांवरही विजेच्या भारनियमनाचे संकट ओढवले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.रोजच विद्युत भारनियमनाच्या नावावर सिंगल फेस विद्युत पुरवठा होतो आणि त्याचा वेळही ठराविक नाही. अचानक विद्युत पुरवठ्यात कमी-जास्त दाब होत असल्याने शेतकऱ्यांच्या कृषीपंपात बिघाड होत आहे. काही शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या मोटारी जळल्यात. यामुळे पाणी असून शेतात ओलीत करु शकत नाही आणि रबी पिकांच्या पेरणीला विलंब होत असल्याच्या तक्रारी आहे. पूर्वीच जंगली डुक्कर व रोही यामुळे शेतीचे नुकसान झाले. यापुढेही वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होणार यात शंका नाही. अशातच विद्युत पुरवठ्यामध्ये गैरसोय झाल्यास रबीची पेरणी करायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.राज्य सरकारच्या विद्युत कंपनीला महावितरण असे संबोधले जाते. मात्र प्रत्यक्षात वीज वितरणाची सोय पाहता महावितरण न म्हणता महामरण असेच म्हणण्याची पाळी आली आहे. या शब्दात बळीराजा रोष व्यक्त करीत आहे.सद्यस्थितीत सर्वच जलाशयात काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळसाही पुरवठा होत आहे. आणि वीज निर्मीती करणारे अधिकारी - कर्मचारी रोज सेवा देत आहे. एवढी सारी जमेची बाजू असताना विद्युत पुरवठ्याची गैरसोय ग्रामीण नागरिक व बळीराजावर का ओढवली जाते, असा प्रश्न या निमित्ताने ग्रामीण शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या अथवा कोणत्याही कारणाने शेतीचे नुकसान झाल्यावर आणि सर्वत्र आंदोलने छेडल्यानंतर मदतीचे पाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली जातात. निवडणुकीच्या वेळी बळीराजाला पुढारी- नेत्यांकडून समस्या सोडविण्याचा लालीपॉप दाखविला जातो. मात्र ऐन संकटकाळी साऱ्यांकडूनच पाठ फिरविली जात असल्याचा शेतकरी व ग्रामस्थ यांचा आरोप आहे.शेतकऱ्यांना खरी गरज असेल ती सिंचन व्यवस्था, २४ तास योग्य दाब असलेला वीज पुरवठा, स्वस्त दरात बि-बियाणे, खत, कृषी साहित्य, शेतीमालाला योग्य भाव आणि संकटकाळी सरकारी मदत याची. ही मदत शासकीय यंत्रणांनी पुरवावी, अशी बळीराजाची अपेक्षा आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांचे दिवस सुधारणार आहे, अन्यथा त्यांची चिंता कायमच राहणार आहे. (वार्ताहर)